सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

खरपुडी बनते तालुक्यातील विकासाचे रोल मॉडेल, दूरदृष्टी : विविध मार्गाने ग्रामपंचायतीने खेचून आणला विकास निधी


जालना जिल्हा प्रतिनिधी समाधान खरात:
       तालुक्यातील शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खरपुडी गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सरपंच कविता अरुण गिरी यांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध मार्गाने विकास कामासाठी निधी खेचून आणला आणि गावांमध्ये विकास कामाचा धडाका लावला आज गावाचा चेहरा मोहरा बदलत आहे तालुक्यातील खरपुडी हे गाव विकासाचे रोल मॉडेल बनत आहे
            जालना तालुक्यातील खरपुडी गावाच्या विकास कामासाठी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची अरुण गिरी यांनी अलीकडेच भेट घेतली जवळपास 45 लाख रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला   मयूर फोटो
जवळपास साडेतीन हजार लोकसंख्येचे असलेले हे गाव या ठिकाणी आनंदाने असणारे विविध जाती धर्माचे लोक सातत्याने विकास कामाला सहकार्य करत असून शासन प्रशासन स्तरावरून या गावाला होणारी मदत यामुळे गावाचा कायापालट होताना दिसत आहे गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी तसेच विस्तार अधिकारी आणि  ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी आर.बी. कोथलकर उपसरपंच भरत शेजुळ तसेच माजी पंचायत समिती सभापती समाधान शेजुळ ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक या सर्वांनी सरपंच कविता अरुण  गिरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ग्रामविकासाला दिलेली साथ महत्त्वाची ठरली गावामध्ये आज घडीला समशानभूमीचे सुशोभीकरण तसेच गावामध्ये ओला कचरा सुका कचरा याचे व्यवस्थापन सर्वांना पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था गावामध्ये असलेल्या चर्च या प्रार्थनास्थळासमोर पेवर ब्लॉक बसवून वृक्षारोपणाचे काम तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण तसेच पेवर ब्लॉक बसवून हाय मॅक्स विद्युतीकरण गावातील रस्त्याचे काम ही सर्व कामे जोमाने सुरू असून अवघ्या महिनाभरामध्ये सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वास अरुण गिरी यांनी दिला एवढेच नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी गुण्या गोविंदाने नांदत असलेल्या सर्व जाती धर्मातील जनतेसाठी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे विकास निधी मंजूर करून आणला अलीकडेच फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची आपण भेट घेतली असून त्यांनी गाव विकासासाठी 45  लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले आहे यामधून आरोग्य शिक्षण तसेच महिला सक्षमीकरण गाव सुशोभीकरण यासह खरपुडी गावाला सर्व नागरी सुविधा पुरविण्याचा आटोकाट प्रयत्न असून लवकरात लवकर ही कामे पूर्ण होतील असा विश्वास अरुण गिरी यांनी व्यक्त केला तालुक्यामध्ये खरपुडी हे गाव नक्कीच विकासाचे रोल मॉडेल ठरेल हे तितकेच खरे
 

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत