सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

वलखेड येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित ग्रामविकास पॅनल सर्वाधिक मतांनी विजयी...


परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील वलखेड येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्यांनी विश्वनाथ केरोबा बिल्हरे विजयी झाले आहेत. या विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्ये ग्रामविकास पॅनलचे एकूण 8 उमेदवार रिंगणात उतरले होते. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे त्यांना मिळालेली मते 
बील्हारे विश्वनाथ केरबा सर्वसाधारण 107 मताधिक्यांनी विजयी झाले. ड वारे सुभाष त्रिंबक 104 मते, डवारे भागवत विश्वनाथ 83 मते, डवारे कुंडलिक बापूराव 88 मते, डवारे विठ्ठल ज्ञानोबा 75 मते, सुरुंग प्रभाकर दादाराव 88 मते, सुरुंग विश्वनाथ रामकिसन 77 मते, सुरंग सुभाष बाबासाहेब 79 आशा मताधिक्यांनी उमेदवार विजयी झाले आहेत आणि यांच्या या विजयाबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार व आभिनंदन करण्यात आले. दैनिक चकमक च्या प्रतिनिधीशी बोलताना लक्ष्मण बिल्हारे यांनी सांगितले की विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत