सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणि परिसरात जोरदार पाऊस,अधीच पावसाने शेतकरी हैराण

 तळणी प्रतिनीधी रवी पाटील
रविवार रोजी तळणीसह सपूर्ण परीसराला जोरदार पावसाने झोडपून काढले चार दीवसापूर्वी पडलेल्या ढगफूटीस सदृश्य पावसाच्या तडाख्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच आज दुपारी पाच वाजे च्या सुमारास अचानक मोठ्या पावसाला सुरवात झाल्याने रस्त्यावर व्यवसाय करणार्याची फजीती झाली 
      आधी पासून तळणीसह सपूर्ण परीसरात मोठया प्रमाणाता वातावरणात उकाडा होता या खरीप हंगामात आधीच शेतकर्याचे सोयाबीन कापूस तूर मुग ऊडीद पिकांचे मोठे नुकसान झाले गेल्या चार दीवसात शेतात साचलेले पाणी काढूण देण्यात शेतकरी व्यस्त होते साचलेले पाणी कसेबसे कमी होत नाही तोच आज पावसाने पून्हा तडाखा दिल्याने शेतकरी मेटाकुटीस आला तळणी मंडळात या बर्षी सलग दोन वेळा अतिवृष्टी झाली तरी आता पर्यंत कुठला पंचनामा ना पाहणी झाली प्रशासन स्तरावर सरसकट मदतीची कुठलीच घोषणा आजपर्यन्त झाली नाही लवकरच रब्बी हंगामाची तयारी शेतकर्याना करायची आहे तरी आर्थीक नियोजन काटकसरीने करावे लागणार असुन महीन्यावर आलेल्या दीवाळी सण सुध्दा यावर्षी गोड होण्याची शक्यता दीसत नाही शासनाने व नव्याने पांलंकत्र्याची जबाबदारी घेणारे अतूल सावे मंठा परतूर मंतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर विधान परिषद सदस्य राजेश राठोड हे कधी लक्ष घालनार असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी विचारत आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत