सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

आ.लोणीकरांचे हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप.


 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे द्वारा आयोजित " मन की बात ", या ऊपक्रमाअंतर्गत " परीक्षा पे चर्चा " या संदर्भात विवीध विषयावार शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

श्री समर्थ माध्यमिक विद्यालय पाटोदा[ माव ] या शाळेतुन या चित्रकला स्पर्धेसाठी मोठ्या संखेने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी स्पर्धकांमधुन प्रथम तिन विजयी स्पर्धकांना माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांचे हस्ते जवाहर नवोदय विद्यालय आंबा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षिस देवुन सन्मानीत करण्यात आले.
या स्पर्धेत शेख सानिया नबी, प्रतिक्षा गायकवाड , करण बोराडे या स्पर्धकांनी यश मिळवले. 
शासनाच्या विवीध शैक्षणिक ऊपक्रमात श्री समर्थ माध्यमिक विद्यालयाचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो या बद्दल मा. आमदार लोणीकर साहेबांनी समाधान व्यक्त करुन मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर व सर्व सहकार्यांना शुभेच्छा दिल्या.
केंद्रप्रमुख श्री शंकरराव थोटे गट समन्वायक कल्याणरावा बागल यांनी ही समर्थ टिमचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत