न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

शेतकऱ्यांच्या कापसाला 12000 प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा व विज बिल माफ करण्यात यावे, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परतुर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन


 परतुर  प्रतिनिधी कैलाश चव्हाण
 वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र भर कापसाला 12000 प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा याकरता महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल  महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे 
कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. शासनाचा हमीभाव ६ हजार असल्यामुळे खाजगी व्यापारी सुध्दा ७ ते ८ हजारामध्ये कापूस खरेदी करत आहेत. हा भाव शेतकऱ्यांना परवडत नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. अजुन शेतकऱ्यांचा ७०-८० टक्के कापुस घरामध्ये पडून आहे. हा कापुस शेतकऱ्यांना विकणे खुप गरजेचे असुन त्यांच्या मुलां-मुलींचे लग्न शिक्षण व दैनंदीन गरजा भागवण्यासाठी कापुस विकणे गरजेचे आहे.
योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे व इतर शेतीशी संबंधीत प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कापसाला हमीभाव १२ हजार रूपये करावा व शासनाने स्वतः कापूस खरेदी करावा.
महाराष्ट्र शासनाने घरगुती वीज बीलाच्या युनिट मध्ये वाढ न करता इतर आकारामध्ये भरमसाठ वाढ केलेली असुन त्यामुळे ती दिसुन येत नाही. केलेली वीज बिलामधील वाढ ही नागरीकांना परवडणारी नसुन ती संपुर्ण जनतेची दिशाभुल करणारी आहे. ती अतिरीक्त वाढ सर्व सामान्य जनतेवर हकनाक पडत आहे ती अतिरीक्त वाढ तात्काळ रद्द करावी. असा इशारा वंचित बहुजन आघाडी परतुर तालुका अध्यक्ष रवी भदर्गे रोहन वाघमारे बाबासाहेब शिंदे सुभाष खरात विजय खरात राहुल नाटकर आकाश मुंडे सदाभाऊ शिरसाठ प्रवीण मोरे यांच्या वतीने देण्यात आले आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत