सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सामाजिक बांधिलकी म्हणून एक दिवस समाजासाठी खर्च करा:- निर्धास राठोड


परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
  क्रांतिकारी संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास भूमिपूजन समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा असंख्य लोकप्रतिनिधी व अध्यात्माशी निगडित मान्यवर पोहरादेवी ला येत असून बंजारा समाज बांधव आणि डॉ रामराव बापूंना मानणाऱ्या समस्त नागरिकांनी तीर्थक्षेत्र पोहरादेवी ला येण्याचे आवाहन निर्धास राठोड यांनी केले आहे.
     संपूर्ण मानव जातीला भूतदया,निसर्गातमानवता,प्रति आदराचीभावनासातत्याने जपण्याचीशिकवणूक दिलेल्या संतसेवालालमहाराज तीर्थभूमीआणि सती सामकी मातादेवस्थान उमरी गड पायाभूतविकासाच्याभूमिपूजनासाठी
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस येणार आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत शासनातील अनेक मान्यवर आणि अध्यात्म क्षेत्रातील असंख्य गणमान्य उपस्थित राहणार असल्याने समस्त समाज बांधव भगिनींनी या सोनेरी क्षणाचे भागीदार होण्यासाठी येथे 12 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन निर्धास राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत