लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

सामाजिक बांधिलकी म्हणून एक दिवस समाजासाठी खर्च करा:- निर्धास राठोड


परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
  क्रांतिकारी संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास भूमिपूजन समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा असंख्य लोकप्रतिनिधी व अध्यात्माशी निगडित मान्यवर पोहरादेवी ला येत असून बंजारा समाज बांधव आणि डॉ रामराव बापूंना मानणाऱ्या समस्त नागरिकांनी तीर्थक्षेत्र पोहरादेवी ला येण्याचे आवाहन निर्धास राठोड यांनी केले आहे.
     संपूर्ण मानव जातीला भूतदया,निसर्गातमानवता,प्रति आदराचीभावनासातत्याने जपण्याचीशिकवणूक दिलेल्या संतसेवालालमहाराज तीर्थभूमीआणि सती सामकी मातादेवस्थान उमरी गड पायाभूतविकासाच्याभूमिपूजनासाठी
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस येणार आहेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत शासनातील अनेक मान्यवर आणि अध्यात्म क्षेत्रातील असंख्य गणमान्य उपस्थित राहणार असल्याने समस्त समाज बांधव भगिनींनी या सोनेरी क्षणाचे भागीदार होण्यासाठी येथे 12 फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन निर्धास राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत