सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पोहारादेवी तीर्थक्षेत्र विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे बंजारा बांधवांनी साक्षीदार व्हावे -सामाजिक कार्यकर्ते मोहन आडे

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
 बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोरागड व उमरी येथे येत्या १२ फेब्रुवारीला होणाऱ्या संत सेवालाल महाराज अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वज रोहन आणि ५९३ कोटी रुपयेची तीर्थक्षेत्र विकास कामांचा भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे बंजारा बांधवांनी साक्षीदार व्हावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते मोहन आडे यांनी केले.
जालना जिल्ह्यातील परतूर मंठा घनसावंगी अंबड,जालना तीन मतदार संघात बंजारा समाज जास्ततीन मतदार संघात बजारा समाज जास्त प्रमाणात वास्तव्यास आहे. मोहन आडे हे तांडो तांडा जाऊन प्रत्येक नागरिकांना वैयक्तिक भेटून येत्या १२ फेब्रुवारीला बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे होणाऱ्या सेवाध्वज कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान करत आहे.

या भव्य समारंभ कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, कॅबिनेट मंत्री नामदार संजय राठोड यांच्यासह मंत्रीगण, आमदार, खासदार आणिसमाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती उपस्थित राहून, संत सेवालाल महाराजाचे दर्शन घ्यावे व या कार्यक्रमात लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे.

आपल्या बंजारा समाजाची एकता व संघटन शक्ती सरकार समोर दाखवून समाजाच्या विविध समस्या प्रश्न व विकास सोडविण्याकरिता माता-भगिनीसह यावे असे आव्हान मोहन आडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत