सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पुतळा परिसरात विटंबना प्रकरणी त्या आरोपची सखोल चौकशी करणे बाबत राष्ट्रीय लहूशक्ती संघटने चे निवेदन

   जालना प्रतिनिधी समाधान खरात
     खरपुडी तालुका जिल्हा जालना येथे काही दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरामध्ये आरोपी शंकर जाधव यांनी येथे विटंबना केली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली आहे परंतु सदर आरोपीने ही विटंबना एकट्यानेच केली किंवा आणखीन कोणी होते किंवा त्याला या विटंबना करण्यासाठी कोणी पाठबळ दिले का याची सखोल चौकशी करून संबंधितात वर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय लहुजी लहूशक्ती संघटनाने एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक यांना केलेली आहे
   निवेदनात पुढे सांगितले आहे की संबंधित कारवाहिनी लवकरात लवकर झाली नाही तर राष्ट्रीय लहुशक्ती संघटना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केला आहे
   या निवेदनावर शहराध्यक्ष योगेश भोसले शाखा अध्यक्ष रितिक भोसले साहिल भोसले आशिष भोसले आतिश भोसले आशिष मनोज भोसले किरण घोरपडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत