सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

तळणी परीसरात गारपीट,शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान





तळणी प्रतीनीधी रवी पाटील
गारपीटग्रस्त शेतकर्योना मदतीसाठी 
३३ टक्के नुकसानीच्या अटीची आड खाठी

  तळणी येथे काल झालेल्या गारपीटग्रस्त ठिकाणची पाहणी मंठा तहसीलदार कैलासचद्र वाघमारे यानी केली ज्वारी आणि कांदा पिक असलेल्या ठिकाणची पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला या पाहणी दरम्यान मंठा कुषी अधिकारी व्ही जी राठोड मंडळ अधीकारी भगवान घुगे कृषी मंडळ अधिकारी आर आर आघाव तलाठी गोपाल कुटे तळणी चे गौतम सदावर्ते उंपसरपंच विश्वनाथसिंग चंदेल ज्ञानेश्वर सरकटे .करीम पठाण गजानन सरकटे शेतकरी विश्वबंर सरकटे बाबूमामा रणमूळे उपस्थीत होते 
यावेळी तहसीलदार वाघमारे यांनी सांगितले की शासनाच्या ३३ टक्के नुकसानीची अटीच्या अधीन राहुनच शेतकर्यांना मदत होऊ शकते बहुताश शेतकर्यानी गहु व हरभरा सुरक्षीत ठेवला असून पीक विमा भरणा करणार्या शेतकर्या पिक विमा कंपनीकडे तक्रार करण्याच्या सुचना वाघमारे यानी दिल्या तसेच हवामान खात्याने आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे या दोन दिवसात आणखी काही नुकसान झाले तर नुकसान ग्रस्त शेतीची पंचनामे करण्यात येतील असे वाघमारे यांनी सांगीतले सद्यस्थितीत ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने जनावाराना चारा व ज्वारीच्या उत्पादनाला फटका बसणार असल्याचे शेतकरी बाबूराव रणमुळे यानी सांगीतले 
तर यावेळी सिडस कादा उत्पादक शेतकरी विश्वबर सरकटे यानी तहसीलदाराला काद्याचे नुकसान गारपीटीने कशे होते याचे प्रात्यक्षीक स्वरुपात दाखवून दिले
तळणी परीसरात काल झालेल्या गारपीटीमुळे शेतकर्याचे ज्वारी गहू कांदा याचे नुकसान झाले नुकसान ग्रस्त शेतीचे .पंचनामे करून शेतकर्याना मदत करावी अशी मागणी सरपंच गौतम सदावर्ते यानी तहसीलदाराकडे केली

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत