सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

श्री समर्थ माध्य. विद्यालयात मुलींना मोफत सायकल वाटप.


 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
पाटोदा [ माव ] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना मोफत सायकल चे वितरण करण्यात.
दरम्यान मुख्याध्यापक श्री सुरेश पाटोदकर यांनीसांगीतले की , शासनाची ही अत्यंत महत्वाकांशी योजना असुन. शाळेपासुन तिन किलोमीटर अंतरावरुन पायी चालत येणार्या मुलींना या योजणे अंतर्गत मोफत सायकल दिल्या जाते. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्यासाठी या योजणेचा खुप फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले . शासनाकडुन मोफत सायकल मिळाल्यामुळे पायी चालत येण्याचे श्रम वाचतात व मुली दररोज ऊत्साहाने शाळेत ऊपस्थीत राहतात तसेच मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाणही कमी होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन केले.
     गटसाधन केंद्र परतुर चे गटशिक्षणाधीकारी श्री साबळे साहेब , गट समन्वयक श्री कल्याणराव बागल , श्री काटमोडेसाहेब , केंद्रप्रमुख श्री थोटे सर यांनी सायकल प्राप्तीसाठी मार्गदर्शन केले.
    समर्थ शिक्षण प्रसारक' अध्यक्ष माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांनी सर्व मुलींचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत