सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मराठावाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्य विविध उपक्रम

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
     निजामाच्या राजवटीतुन मराठवाडा मुक्त अनेक स्वातंत्र्यवीरांनी प्राणाची आहुती दिली तेव्हा निजामाच्या तावडीतुन आपली सुटका झाली त्या गोष्टीला यावर्षी 75 वर्ष पुर्ण होत आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती परतुर तर्फे वर्षभर विविध कार्यक्रम,उपक्रम सुरु आहेत.परतुर - मंठा तालुका आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम यांच अतुट नात आहे.या चळवळीसाठी परतुर येथे बैठक होवुन अनेक स्वातंत्र्यवीरांनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला व हौतात्म पत्करले याचे स्मरण म्हणुन या वीरांना अभिवादनाचा कार्यक्रम 26 मार्च 2023 रोजी जि.प.प्रशाला येथे सायंकाळी 5.00 होणार आहे तसेच 17 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रत्येक महिन्यात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहे तरी जास्तीत देशभक्त नागरीकांनी,माता-भगिनी,विद्यार्थी मित्रांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहान अमृत महोत्सव समितीचे श्री.प्रकाश काका दिक्षीत,डाँ.भानुदासजी कदम,विठ्ठल कुलकर्णी,अर्जुन जगताप,सचिन काटे,विकास पवार,योगेश दहिवाळ,गजानन मस्के,राहुल मोरे,कुणाल बन्सिले यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत