सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

देशासाठी प्रानांची आहुती देणाऱ्या परिवाराचे सदस्य राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हे दुर्दव्य! काँग्रेसच्या वतीने निषेध निदर्शनात मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी खंत व्यक्त केली.

परतूर/प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
              देशाच्या सेवेसाठी एक नव्हे तर दोन सदस्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा परिवारातील राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हे लोकशाहीला घातक असून हे दुर्दवी असल्याचे प्रतिपादन मा.आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी व्यक्त केली. खा.राहुल गांधी यांच्या रद्द केलेल्या खासदारिकीच्या निषेथ करत आज दिनांक 26 मार्च 2023 रोजी काँग्रेसच्या वतीने आयोजित निषेध निदर्शनात ते बोलत होते. यावेळी मा.आ.सुरेशकुमार जेथलिया, अन्वर बापू देशमुख, नितीनकुमार जेथलिया, बाळु काका आकात, बाबासाहेब गाडगे, इंद्रजित घनवट, संतोष दिंडे, सादेक बापू देशमुख, निळकंठ तौर,माउली तनपुरे, सुखलालाजी राठोड, एजाज जमीनदार, दादारावजी खोसे,बाळू काका ढवळे, बाजीराव खरात, मंजुळदास सोळंके,सचिन लिपने,विकास खुळे, श्रीरंगराव मोगरे,दत्ताकाका तौर, पांडू आबा कुरधने, रुस्तुम राव राजबिंडे, आणिकराव ढवले, उद्धवराव बोनगे, अशोकराव खरात, अर्जुन बरकुले,इंद्रजित डवले, बाळासाहेब भदर्गे,अण्णासाहेब लिपने आदींची उपस्तीती होती. 
मोंढा भागातील काँग्रेस संपर्क कार्यालय परिसरात या निषेध निदर्शनात पुढे बोलताना जेथलिया यांनी लोकशाही घोक्यात असल्याचे म्हणत, जनतेच्या हिताच्या पप्रश्नांबाबत व विशेष देशाच्या अवस्थे बाबत राहुल गांधी यांनी राग व्यक्त करताना जे विधान केले त्याच्या मागील भावनांचा अनुमान घेण्याऐवजी केवळ सत्तेचा गैरवापर करत कायदा समोर करत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही लोकशाहीची हत्या असून जर असेच चालू राहिले तर नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या लोकशाही च्या झालेल्या चेष्टेचा काँग्रेस निषेध करत असून सदरील निर्णय मागे घ्यावा व लोकशाहीला पूरक असे सत्ताधाऱ्यांनी वागावे नसता राज्य व देश पातळीवर काँग्रेस नागरिकांना सोबत घेत आंदोलन आणखीन तीव्र करणार असल्याचा इशारा सुरेशकुमार जेथलिया यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत