सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

तळणी येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
  तळणी महात्मा फुले सा. वाचनालय तळणी येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित गावचे सरपंच गौतम सदावर्ते, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर सरकटे, जयदेव मुर्तडकर,कृष्णा सरकटे, कृष्णा वाघमोडे, ज्ञानेश्वर काजळे,नंदु सरकटे माविम चे लेखापाल सतिश सरकटे व वाचक वर्ग. मोठया प्रमाणात उपस्थीत होता
    या जयंती निमीत्य सरपंच सदावर्ते यानी मनोगत व्यक्त करताना सागीतले आपल्या महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात कर्तृत्वाने मोठी असणारे माणसे जन्माला आली आपल्या पिढीसाठी त्या काळी त्याचा मोठा सघर्ष केला म्हणून ईतिहासाने त्याची नोद घेतली फुले दाम्पत्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य एक आदर्श घेणारे आहे .सद्य स्थीतीत कुठल्याही संताना राष्ट्रपूरुषाना जाती पूरते बघण्याची सकूंचीत प्रवूती वाढत चालली असली तरी त्या महापूरुषाचा तो काळ जातीपूरता नसल्याने त्याचे कार्य कधीही नजरेआड होऊ शकत नाही महापूरुषांचा आदर्शच घ्यायचा असेल तर त्यानी केलेला त्याग व त्याचे विचार आत्मसात करावी लागतील महापूरुषानी सगळ्यांचा विचार करुनच ती जगली आहेत त्याचा समर्पण भाव आजच्या पिढीसाठी एक मोठा आदर्श असुन तो आदर्श प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सरपचं गौतम सदावर्ते यांनी सागीतले या क्रार्यक्रमाचे प्रास्तावीक सुधाकर सरकटे यानी केले तर आभार प्रदर्शन माधवराव सरकटे यानी व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत