सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार विष्णू कदम यांना जाहीर

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  शासनाच्या वतीने दिल्या जाणारा 2022/23 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जालना जिल्हा परिषदेच्या वतीने श्री विष्णू कदम यांना जाहीर झाला आहे शैक्षणिक आणि सामाजिक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकाला हा पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका शाखा परतूर यांच्या वतीने सदर निवड बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला
   या निवडीबद्दल माजी मंत्री तथा विद्यमान आमदार श्री बबनराव लोणीकर साहेब, युवा भाजपा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष बाबुरावजी पवार सर, परिषदेचे विभागीय कोषाध्यक्ष भगवान जायभाये, जिल्हाध्यक्ष मंगेश जैवळ, तालुका अध्यक्ष दिलीप मगर,जिल्हा नेते कल्याण बागल,विष्णू तोटे,रंगनाथ रोकडे,रामेश्वर हातकडके,विष्णुपंत ढवळे,प्रकाशकाका ढवळे व राम सोळंके यासह सर्व शिक्षक बांधवांकडून अभिनंदन होत आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत