सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

रेल्वे स्टेशन परतुर येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा ...

  परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन 67 वर्षे पूर्ण झाले त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व नागरिक आज रेल्वे स्टेशन परिसरात पंचशील ध्वजाजवळ एकत्र जमा झाले होत
    वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल नाटकर झूंगाराम साळवे व प्रकाश वेडेकर यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले त्यानंतर रेल्वे स्टेशन मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस रेल्वे स्टेशन अधीक्षक अमरदीप व सीनियर बुकिंग क्लार्क संजय गाडगे यांनी पुष्पहार अर्पण केला, आपल्या मनोगतात रेल्वे स्टेशन अधीक्षक अमरदीप यांनी म्हटले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मी या पदापर्यंत पोहोचलो आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर खूप उपकार आहेत, यावेळी सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता . यावेळी प्रदीप साळवे, लिंबाजी कदम, प्रशांत साळवे, विकास वेडेकर, प्रशांत वेडेकर,पत्रकार अशोक ठोके,दीपक हिवाळे, नितीन खरात,विजय ससाळे, बाळू लाटे, विकास उमप,रवी इंगळे, कुमार लांडगे, अभिषेक कुलकर्णी उपस्थित.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत