सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पाटोदा येथील श्री समर्थ विद्यालयात पर्यावरण संवर्धन मंडळाची स्थापणा

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
पाटोदा [ माव ] ता.परतुर येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात पर्यावरण संरक्षण व संवर्धन मंडळाची स्थापणा करण्यात आली
   एक आक्टोबर पासुन सुरु असलेल्या स्वच्छता पंधरवाडा निमित्त विद्यालयात विवीध ऊपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 दोन आक्टोबर रोजी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व. लालबहादुर शास्त्रीजींच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
  दरम्यान पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे महत्व व त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी करावयाचा कृतीकार्यक्रम मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी समजुन सांगितला.
  विवीध तेरा विभागात व एकशे एक मुद्यांवर आधारीत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा हा ऊपक्रम वर्षभर विद्यालयात सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .

शाळेतील हरीत सेना विभागाचे वतीने या संपुर्ण कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सुत्रसंचालन चत्रभुज खवल प्रास्विक धनंजय जोशी यांनी केले. रोकडे पाराजी व सातपुते विद्यानंद यांनी मार्गदर्शन केले. सर्व कर्मचारी व विद्यार्थी ऊपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत