पाटोदा येथील श्री समर्थ विद्यालयात पर्यावरण संवर्धन मंडळाची स्थापणा

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
पाटोदा [ माव ] ता.परतुर येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात पर्यावरण संरक्षण व संवर्धन मंडळाची स्थापणा करण्यात आली
   एक आक्टोबर पासुन सुरु असलेल्या स्वच्छता पंधरवाडा निमित्त विद्यालयात विवीध ऊपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 दोन आक्टोबर रोजी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व. लालबहादुर शास्त्रीजींच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
  दरम्यान पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे महत्व व त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी करावयाचा कृतीकार्यक्रम मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी समजुन सांगितला.
  विवीध तेरा विभागात व एकशे एक मुद्यांवर आधारीत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा हा ऊपक्रम वर्षभर विद्यालयात सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .

शाळेतील हरीत सेना विभागाचे वतीने या संपुर्ण कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सुत्रसंचालन चत्रभुज खवल प्रास्विक धनंजय जोशी यांनी केले. रोकडे पाराजी व सातपुते विद्यानंद यांनी मार्गदर्शन केले. सर्व कर्मचारी व विद्यार्थी ऊपस्थीत होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी