सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पाटोदा येथील श्री समर्थ विद्यालयात पर्यावरण संवर्धन मंडळाची स्थापणा

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
पाटोदा [ माव ] ता.परतुर येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात पर्यावरण संरक्षण व संवर्धन मंडळाची स्थापणा करण्यात आली
   एक आक्टोबर पासुन सुरु असलेल्या स्वच्छता पंधरवाडा निमित्त विद्यालयात विवीध ऊपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 दोन आक्टोबर रोजी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व. लालबहादुर शास्त्रीजींच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
  दरम्यान पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे महत्व व त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी करावयाचा कृतीकार्यक्रम मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी समजुन सांगितला.
  विवीध तेरा विभागात व एकशे एक मुद्यांवर आधारीत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा हा ऊपक्रम वर्षभर विद्यालयात सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .

शाळेतील हरीत सेना विभागाचे वतीने या संपुर्ण कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सुत्रसंचालन चत्रभुज खवल प्रास्विक धनंजय जोशी यांनी केले. रोकडे पाराजी व सातपुते विद्यानंद यांनी मार्गदर्शन केले. सर्व कर्मचारी व विद्यार्थी ऊपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत