सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सलग २५ दिवसांपासून उस्वद गावांमध्ये साखळी उपोषणमराठा आरक्षण : परिसरातील गावकऱ्यांचाही सहभाग




तळणी : प्रतिनिनिधी रवी पाटील 
  अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत उस्वद (ता. मंठा) येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. सलग २५ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून, परिसरातील गावकरी, समाजबांधव या उपोषणात सहभागी होत आहेत.
अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर झालेला गोळीबार, लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता १९ सप्टेंबरपासून उस्वद येथील व्यंकेश्वर संस्थानातील सभागृहात सकल मराठा समाजबांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे. मंगळवारी दिनांक ५ आक्टोंबर रोजी उपोषणाला २५ वा दिवस होता. या साखळी उपोषणाला तळणी, देवठाणा , कानडी , वडगाव , कोकरंबा , शिरपूर , इंचा , खोरवड , आनंदवाडी , अंभोरा शेळके , किर्तापूर व दहिफळ खंदारे यांसह मंठा तालुक्यातील विविध गावातील तसेच विविध राजकीय , सामाजिक व मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला.

यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट ...

उस्वद येथील व्यंकेश्वर संस्थानातील सभागृहात सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणाला परतूर- मंठा मतदारसंघाचे आ. बबनराव लोणीकर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र राज्य सदस्य डॉ. पुरुषोत्तम वायाळ, शिवसेना शिंदे गटाचे मंठा तालुकाध्यक्ष उदय बोराडे, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सरकटे, कानडीचे प्रगतिशील शेतकरी नाना खंदारे, तळणीचे माजी उपसरपंच सुधाकर सरकटे, कानडी सरपंच कृष्णा खंदारे , सतीश सरकटे यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला.

तहसीलदार नाही आल्या मग , जिल्हाधिकारी येतील - मनोज जरांगे पाटील 

उस्वद येथील साखळी उपोषणाला मंठा तहसीलदार रूपा चित्रक यांनी भेट न दिल्यामुळे संतप्त सकल मराठा उपोषणकर्त्यांनी  तहसीलदारांचा निषेध केला . होता पंरतू मगळवारी राञी मंठा तहसीलदार रुपा चित्रक यानी राञीच्या वेळी उपोषण स्थळी भेट दिली श्री. मनोज जरांगे पाटील यांनी तहसीलदार नाही आल्या मग , उस्वदला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना बोलुन भेटीला पाठवतो. असं म्हणत उस्वद येथील साखळी उपोषणकर्त्याचे मनोबल वाढवले होते  
    14 आक्टोबर ला होणार्या जंगी सभेसाठी तळणी सह सपूर्ण परीसरात जय्यत तयारी सुरु आहे तळणी येथे तरुण घरोघरी जाऊन चौदा तारखेच्या सभेचे नियोजन करत आहे या सभेची पूर्व तयारी ची बैठक नुकतीच तळणी येथे पार पडली वाहनाचे नियोजन येणार्याची संख्या मोठी असल्याने त्या अनुषंगाने तळणी परीसरात नियोजन लावण्यात सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्य व्यस्त आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत