सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

बंधार्याचे नित्कृष्ट काम शेतकर्याचे जिल्हाधिकार्याना निवेदन


तळणी : प्रतिनिधी तळणी (रवी पाटील)     
   येथून जवळच असलेल्या देवठाणा शिवारात होत असलेल्या बंधार्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याने या बंधार्याच्या कामाची स्वःत जिल्हाधिकार्यानी पाहणी करून संबंधीत ठेकेदारावर योग्य ति कारवाई करवी असे  दिलेेल्या निवेदनात  नमूद केले आहे 
 बंधार्या शेजारील शेतकर्यानी ठेकेदाराला तुम्ही नित्कृष्ट दर्जाचे काम का करता म्हणुन विचारणा केली असता ठेकेदाराने शेतकर्याना . तुला एका तासात गुंडे आनुन उचलुन नेईल व जिवे मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिल्याने धास्तावलेल्या शेतकर्यानी जिल्हाधिकार्याकडे धाव घेऊन सबंधीत कामाच्या दर्जाची पाहणी करण्या संबंधीची विनंती या निवेदनात केली आहे कामाचा दर्जा चांगला ठेवा यासदर्भात शेतकर्यानी अनेक वेळा ठेकेदाराला सांगून सुध्दा या बंधार्याचे काम नित्कृष्ट झाले आहे 

संबंधीत शेतकरी हे सेनगाव तालुक्यातील असुन त्याच्या जमीनी या देवठाणा . शिवारात आहे गट न ४६० / ४६१/ ४६२/४६३ / ४५४ / ४८१ / या गट नबर मध्ये संबंधीत शेतकर्याच्या जमीनी आहेत संबंधीत बंधार्याचे काम मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने मजूर करण्यात आले असुन या कामावर संबंधीत विभागाचे अधिकारी हजर राहत नाही 
नित्कृष्ट काम होत असल्याने बंधारा जास्त दिवस टिकणार नाही यामुळे शेतकर्याचे मोठे नुकसान होईल असेही निवेदनात नमूद केले आहे 

या निवेदनावर ज्ञानदेव वाघ , भगवान वाघ , महादेव वाणी , मदन वाघ , रामेश्वर वाघ , सुभाष वाघ , रामकिसन वाघ , समाधान वाघ , प्रल्हाद वाघ , शालीकराम वाघ , देवीदास वाघ , दिनकर वाघ , इत्यादी शेतकर्याच्या स्वाक्षर्या या निवेदनावर आहे

संबधीत गुतेदार नित्कृष्ट दर्जाचे काम करीत आहे गुंड आनुन उचलून नेण्याची धमकी फोन वर देत आहे कामाची चौकशी होणे गरजेचे आहे नसता आम्ही दि १८ / १२ / २०२३ पासुन गट न .४६२ /व ४६३ या गट नबर मंधील शेतात उपोषण करणार असल्याचे शेतकरी सुदाम वाघ यांनी सांगीतले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत