लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
    आज आनंद इंग्लीश स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गीतगायन स्पर्धा घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
   याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, एकनाथ कदम सर व प्राचार्य नारायण सागुते ,श्रीमती दिपाली हरजुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.  
          कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ कदम सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगातून सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख करून दिली व त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेच असे सांगितले.तसेच प्राचार्य नारायण सागुते यांनी गाण्यातुन सावित्रीबाईच्या विचारावर प्रकाश टाकला.
  विद्यार्थ्यांनी अनेक समाजसुधारकांच्या जीवन चरित्रावर, देशभक्तिपर गीते, कविता सादर केल्या,आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विकास काळे यांनी केले.
याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत