लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

दि जालना पीपल्स बँक निवडणूक ,सचिन सांबरे यांचा विकासकुमार बागडी यांना जाहीर पाठींबा


जालना प्रतीनिधी समाधान खरात 
  जालना पीपल्स बँकेच्या निवडणुकीत आता कुठे रंगत येऊ लागली आहे. या निवडणूकीतील उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारास प्रारंभ केला आहे. दरम्यान, अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार विकासकुमार बागडी यांना सचिन रुपचंद सांबरे यांनी जाहीर पाठींबा दर्शविला आहे. 
   यावेळी खाटीक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मनोज बागडे, भुषण सांबरे, पांडुरंग शिंदे, अनिल लष्कर, कैलास गायकवाड, रवि सांबरे आदींसह असंख्य लोक व मतदार उपस्थित होते.
 सांबरे यांनी केवळ पाठींबाच दर्शविला नाही तर ते आता विकासकुमार बागडी यांचा प्रचार देखील करणार असून त्यांच्या विजयासाठी आपण आपल्या जीवाचे रान करु, अशी ग्वाही  सांबरे यांनी दिली आहे.
जालना पीपल्स बँक ही व्यापार्‍यांची बँक असली तरी या ठिकाणी सर्वसामान्य नागरीकांची कामे व्हायला पाहिजेत म्हणूनच आपण या निवडणूकीत उतरलो असल्याचे श्री. विकासकुमार बागडी यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत