सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बचत गटाच्या महिलांनी बँकेच्या अर्थसहाय्य घेऊन प्रगती साधावी. -- मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी




सोयंजना येथील परमार्थ आश्रम येथे महिला मेळावा संपन्न


परतूर -- प्रतिनिधी कैलाश चव्हाण 

बचत गटाच्या महिलांनी स्टेट बँकेचे अर्थसहाय्य घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती साधावी असे
   आवाहन भारतीय स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी यांनी केले. ते सोयंजना येथील परमार्थ आश्रमावर महिला बचत गटांच्या मेळाव्या प्रसंगी बोलत होते. त्यावेळी पुढे बोलतांना सावजी म्हणाले की बँकेने महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाची परतफेड नियमित केल्याने महिला गटाची प्रगती निश्चित आहे. बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना दिलेले अर्थ सहाय्यातून महीला बचत गट यशस्वी चालवत अनेक गटांनी प्रगती साधली आहे. महिलांनी आपला प्रपंच चालवताना काटकसर करुण कुटुंबाची बचत करावी.

नियमित कर्ज फेड करणाऱ्या व्यावसायिक बचत गटाच्या महिलांना लखपती दीदी योजने अंतर्गत लखपती महीला योजनाचा लाभ महिलांना दिला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबावर आलेले संकट हे मोठे संकट निर्माण झाल्याने त्यांच्यावर आलेले संकट हे कोणीही निवारू शकत नाही. त्यासाठी वीमा हि काळाची गरज आहे. महिलांनी दैनंदिन गरजा पूर्ण करीत असताना शासनाचा प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजनेत सहभागी व्हावे.

महिलांनी वीमा संरक्षण घेत आपल्या कुटुंबाला सुरक्षित करावे. तसेच उतार वयात वयाची साठ वर्षानंतर अटल पेन्शन योजनेत आपल्या कुटुंबाला सहभागी करून घ्यावे. उतार वयात पेन्शन निश्चित करुण घ्यावे. दहा वर्षांच्या खालील मुलीसाठी शासनाच्या सुकन्या समृध्दी योजना सहभागी व्हावे.असे आवाहन शेवटी सावजी यांनी केले आहे. त्यावेळी भारतीय स्टेट बँकेचे उपशाखा व्यवस्थापक मनोहर गावडे,श्रीनिवास महाराज, शिवलिंग महाराज मोरे उपस्थीत होते. 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत