लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

विश्वनाथ विद्यालयामध्ये वृक्षारोपण संपन्न

तळणी प्रतीनीधी रवी पाटील
तळणी येथे विश्वनाथ विद्यालयामध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले एक वृक्ष एक जीवन या दिव्य मराठीच्या उपक्रमाचे औचित्य साधून व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांच्या वाढदिवसाच्याएकwनिमित्ताने गावातील तीनही शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिक्षकांनी झाडांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पीसी
   लावलेले झाड याचे संगोपन कसे होईल याची काळजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला सरपंच गौतम सदावर्ते विश्वनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लोडे सर शिक्षक गण व अन्य कर्मचारी उपस्थित होते असाच कार्यक्रम केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी येथे सुद्धा घेण्यात आला

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत