सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

विश्वनाथ विद्यालयामध्ये वृक्षारोपण संपन्न

तळणी प्रतीनीधी रवी पाटील
तळणी येथे विश्वनाथ विद्यालयामध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले एक वृक्ष एक जीवन या दिव्य मराठीच्या उपक्रमाचे औचित्य साधून व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सरकटे यांच्या वाढदिवसाच्याएकwनिमित्ताने गावातील तीनही शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिक्षकांनी झाडांचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पीसी
   लावलेले झाड याचे संगोपन कसे होईल याची काळजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला सरपंच गौतम सदावर्ते विश्वनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लोडे सर शिक्षक गण व अन्य कर्मचारी उपस्थित होते असाच कार्यक्रम केंद्रीय प्राथमिक शाळा तळणी येथे सुद्धा घेण्यात आला

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत