सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

समर्थ विद्यालयात छायाचित्रे प्रदर्शन.

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
पाटोदा [ माव ]  येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात विवीध जातींच्या सापांचे छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आहे होते.
  नाग पंचमी या  सणाला नागदेवतेचे पुजण श्रध्देने केले जाते. साप हा शेतकर्यांचा मित्र आहे. पर्यावारणाचे संतुलनासाठी सापांचे महत्व अनन्य साधारण आहे. 
प्रत्येक साप हा विषारी नसतो. आपल्या परिसरात सापडणारे बहुतांश साप हे बिनविषारी असतात. भिती पोटी साप दिसताच त्याची हत्या केली जाते.
   विद्यार्थ्यांना बालवयातच विषारी व बिन विषारी साप ओळखता यावेत. त्यांचा अधिवास , शास्त्रीय व बोली भाषेतिल नाव यांचा परीचय व्हावा या साठी या चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी सांगितले .
दरम्यान अनेक गावकर्यांनी प्रदर्शनास भेट देवुन विद्यालयाच्या या ऊपक्रमाचे कौतुक केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विवीध जातींचे सापांची माहिती लिहुन घेतली. 
 कर्मचारी बंधुनी ऊपक्रमाचे यशस्वीते साठी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत