गावांच्या शाश्‍वत विकासासाठी टाटा व्हॉलिंटीअर्सचे काम कौतुकास्पद -डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, टाटा व्हॉलिंटीरिंग वीकच्या माध्यमातून जलसंवर्धन जनजागृती उपक्रम


 परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  गावांचा शाश्‍वत विकास साधायचा असेल तर समाजातील सर्व घटकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येणे काळाची गरज आहे. नेमके हेच काम टाटा पॉवरच्या टीमने हाती घेवून अंबा आणि डोल्हारा शिवारात उत्कृष्ट दगडी बंधारा बांधून जलसंवर्धनाचे काम हाती घेतल्याने शिवार बहरले आहे. या उपक्रमाने पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे व्हॉलिंटीअर्सचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोउद्गार जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काढले.