सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

टाळ मृदंगाच्या गजरात बाप्पाला निरोप सांस्कृतिक परंपरा जपत "तरुण" गणेश मंडळ गोळेगाव च्या आकर्षक मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष...

आष्टी प्रतीनिधी 
गाळेगाव येथे टाळ मृदगाच्या गजरात पारंपारिक पद्धतीने बप्पाचे विसर्जन करण्यात आले 
 सध्या च्या काळात कर्कश डि.जे. आणि डोळ्यांना इजा पोहोचणाऱ्या लेझर किरणांचा सर्रास वापर कुठल्याही कार्यक्रमात आत्ता सर्वसाधारण झाला आहे,परंतु या सर्व बाबींना फाटा देत परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील मानाचा समजला जाणारा तरुण गणेश मंडळ या सर्वांना अपवाद ठरला आहे. 
  टाळ मृदंगाच्या गजरात आणि सुमधुर अभंगाच्या  संगीतात गावातील मुख्य रस्त्याने गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली,रस्त्याच्या दुतर्फा महिला मंडळींनी रांगोळी काढत वारकऱ्यांचे औक्षण केले.विशेष म्हणजे या मिरवणुकीत नवीन पिढीतील तरुणांचा गळ्यात टाळ घेत, विशेष सहभाग जाणवला यामुळे तरुणांच्या मनात नक्कीच पारंपरिक भक्तिभाव रुजेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष श्री. गंगाधर दगडू कांडुरे यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षी देखील अशीच हरी नामाची परंपरा कायम राहो, विविध प्रकारच्या पारंपरिक कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी बाप्पा बळ देवो असा विश्वास व्यक्त करत बाप्पांना जड अंतःकरणाने पवित्र अश्या गोदावरी नदीत विसर्जित केले...

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत