लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

टाळ मृदंगाच्या गजरात बाप्पाला निरोप सांस्कृतिक परंपरा जपत "तरुण" गणेश मंडळ गोळेगाव च्या आकर्षक मिरवणुकीने वेधले सर्वांचे लक्ष...

आष्टी प्रतीनिधी 
गाळेगाव येथे टाळ मृदगाच्या गजरात पारंपारिक पद्धतीने बप्पाचे विसर्जन करण्यात आले 
 सध्या च्या काळात कर्कश डि.जे. आणि डोळ्यांना इजा पोहोचणाऱ्या लेझर किरणांचा सर्रास वापर कुठल्याही कार्यक्रमात आत्ता सर्वसाधारण झाला आहे,परंतु या सर्व बाबींना फाटा देत परतूर तालुक्यातील गोळेगाव येथील मानाचा समजला जाणारा तरुण गणेश मंडळ या सर्वांना अपवाद ठरला आहे. 
  टाळ मृदंगाच्या गजरात आणि सुमधुर अभंगाच्या  संगीतात गावातील मुख्य रस्त्याने गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली,रस्त्याच्या दुतर्फा महिला मंडळींनी रांगोळी काढत वारकऱ्यांचे औक्षण केले.विशेष म्हणजे या मिरवणुकीत नवीन पिढीतील तरुणांचा गळ्यात टाळ घेत, विशेष सहभाग जाणवला यामुळे तरुणांच्या मनात नक्कीच पारंपरिक भक्तिभाव रुजेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष श्री. गंगाधर दगडू कांडुरे यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षी देखील अशीच हरी नामाची परंपरा कायम राहो, विविध प्रकारच्या पारंपरिक कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी बाप्पा बळ देवो असा विश्वास व्यक्त करत बाप्पांना जड अंतःकरणाने पवित्र अश्या गोदावरी नदीत विसर्जित केले...

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत