सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी विवेकानंद सेवा केंद्राच्या 4 शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण 
दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती परतुर अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विवेकानंद सेवा केंद्र संचलित, विवेकानंद इंग्लिश स्कूल (CBSE) चा विद्यार्थी काव्य किशोर पाटील ध्रुव रघुनंदन झंवर, विवेकानंद पब्लिक स्कूल (State Board) ची विद्यार्थिनी संचिता शिवाजी बोराडे, विवेकानंद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी सोहम शशिकांत देशपांडे तसेच विवेकानंद माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अदिती मोहन ढवळे या सर्वांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच विज्ञान शिक्षक बाळासाहेब मुंडे सर निलेश सरदार सर आकात मॅडम फाजगे सर या सर्वांचे  अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. एस. जी. बाहेकर साहेब ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय संदीप दादा बाहेकर, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे साहेब गट समन्वयक कल्याण बागल सर डॉ. स्मिता रोडगे मॅडम अशोक राठोड सर सर्व परीक्षक तसेच सर्व शिक्षकांना अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत