सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

केंद्रीय प्राथमिक शाळा आंबा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
केंद्रीय प्राथमिक शाळा आंबा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली
  या  कार्यक्रमाचे अध्यक्ष  दत्तराव घुले पाटील प्रमुख अतिथी  कृष्णाजी भदर्गे मा.पंचायत समिती सदस्य  दादारावजी बोंनगे केंद्रीय मुख्याध्यापक  सी बी पतंगराव सर यांची उपस्थिती होती .
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे पोवाडा गीत यांचे सादरीकरण केले. दिलीप मगर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवना वर प्रकाश टाकला  .यावेळी शालेय समितीचे सदस्य  तुकारामजी पठाडे  रामजी कोरडे  विलासराव डोईफोडे  सुनील बोंनगे व गावकऱ्यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  नारायणराव राऊत  दिलीप मगर  बाबुराव पारदेवाड  दिनेश लाचुरे  भगवानराव शेरे सलीम कायमखानी श्रीमती पूनम पवार श्रीमती शालिनी तोगरे आदींनी परिश्रम केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक  पतींगराव यांनी केले तर आभार श्रीमती पूनम पवार यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत