सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी क्रांतिगुरू लाहुजींची प्रखर देशभक्ती तरुणांना प्रेरणादायी देणारी-दगडुबा घोडे यांचे प्रतिपादन

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
लहुजींचे वडील क्रांतिकारी राघोजी साळवे इंग्रजां
विरुद्धच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले.त्याप्रसंगी देशभक्त क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाची सुटका व्हावी या प्रेरणेतून जगेल तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी अशी भीष्मप्रतिज्ञा घेतली. क्रांतिगुरू लाहुजी वस्ताद साळवे यांची प्रखर देशभक्ती तरुणांना प्रेरणादायी देणारी आहे असे प्रतिपादन समाजसेवक दगडुबा घोडे यांनी केले.परतूर येथील रेल्वे स्टेशन समोरील मुख्य मध्य मार्गावरील लहुजी चौकात क्रांतिगुरू लाहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विलासराव, लोखंडे, प्रकाश लोंढे, सुंदर  हिवाळे,विजय वाणी यांची उपस्थित होती
पुढे बोलतांना दगडुबा घोडे म्हंणले की, लहुजींच्या आखाड्यात व्यायामाचे धडे घेण्यासाठी व शरीर बळकट करण्यासाठी ज्योतिबा फुले,लोकमान्य टिळक,वासुदेव बळवंत फडके, विठ्ठल वाळवेकर, नाना मोरोजी, नाना छत्रे ,उमाजी नाईक सखाराम परांजपे, सदाशिव बल्लाळ,गोवंडे गुरुजी आदींनी प्रशिक्षण घेतले लहुजींच्या या शिष्यांनी भविष्यात आपापल्या आवडीनुसार, ध्येयानुसार सामाजिक, राजकीय व क्रांतिकारी क्षेत्रात कार्य करून नावलौकिक मिळवला. लहुजींनी सर्व शिष्यांना कुस्ती ,दांडपट्टा ,लाठीकाठी,नेमबाजीचे प्रशिक्षण दिले. 
लहुजी वस्ताद आयुष्यभर अविवाहित राहून भीष्मप्रतिज्ञाचे जीवनाच्या अंतापर्यंत पालन केले. इंग्रजांविरोधी क्रांतिकारकांची पलटण उभी केली. स्वतः भूमिगत राहून राष्ट्रकार्यासाठी अखंडपणे इंग्रजांशी झुंजत राहिले.वस्ताद लहुजी व त्यांच्या त्यांचे शिष्य पुढच्या काळात भूमिगत होऊन क्रांतिकारी कार्य करीत होते.आजच्या तरुणांनी क्रांतिकारी लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांचे आचरण करावे.असे यावेळी दगडुबा घोडे यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत