Posts

Showing posts from January, 2026

निस्वार्थ केलेला परमार्थ हाच उच्च कोटीचा आनंद देतो– विलास महाराज गेजगे

Image
तळणी प्रतिनिधी  रवी पाटील  परमार्थ करत असताना आनंद होत असेल तर आपण परमार्थ करत आहोत ही भावना निर्माण आपोआप होते काही जण म्हणतील परमार्थात आनंद कसा तर प्रत्येक मनुष्य परमार्थ करत नाही प्रत्येक मनुष्य माळकरी नाही प्रत्येक मनुष्य गंध टिळा बुक्का लावत नाही .माळ घालण्यासाठी परमार्थ करण्यासाठी प्रवृत्त होण्यासाठी या जन्मात मनुष्याला अनंत जन्माची पुण्याई निश्चित लागते तर त्या मनुष्याकडून निस्वार्थ परमार्थ घडू शकतो व तो परमार्थ करत असताना त्या मनुष्याला उच्च कोटीचा आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन विलास महाराज गेजगे यांनी तळणी येथे केले यंदाचे या सप्ताहाचे हे विसावे वर्ष असून श्री संत सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्याकडून या भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आता भय नाही असे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची या अभंगावर महाराजांनी निरूपण केले परमार्थ हा प्रत्येकाला न घडण्याचे कारण म्हणजे त्याच्या मुळात तील पाप वृत्तीचा दोष परमार्थिक वृत्ती साठी पूर्वीचे संचितही खूप महत्त्वाचे आहे त्याशिवाय या कलियुगात म...

अभेदाची भक्तीच देवाला प्रिय; भेद त्यागून परमार्थ करा – दशरथ अंभोरे महाराजांचा

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  परमार्थ करायचा असेल तर तो अभेदाच्या भावनेतूनच झाला पाहिजे. भेद धारण करून केलेली भक्ती देवाला प्रिय ठरत नाही. *अभेदाची भक्ती करावी, तीच भक्ती देवाला प्रिय आहे*, असा रोखठोक व विचारप्रवर्तक उपदेश दशरथ महाराज अभोरे यांनी तळणी येथे केला. हरीच्या भक्त नाही भय चिंता या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केले परमार्थिक साधना करत असताना अनेक अडचणी येत असतात परंतु मनाभावातून केलेली साधना ही त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचते फक्त त्या साधनेमध्ये अहंकार गर्व नसला पाहिजे आदर व ही नम्रपने केलेली साधनांचा स्वीकार देऊ नक्की करत असतो  श्री संत सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी कीर्तनसेवेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आधार घेत परमार्थाचा खरा अर्थ उलगडून सांगितला. महाराज म्हणाले की, आज अनेक जण परमार्थ करत असतानाही अंतःकरणात भेद बाळगतात. संसारामध्ये अभेद पाहिला जातो आणि परमार्थामध्ये भेद केला जातो, ही मोठी चूक आहे. *खरं तर संसारात भेद हवा आणि परमार्थात अभेद...

ज्ञानोबा तुकोबा शिवबा शिवाय या महाराष्ट्राचा इतिहास कधीच पूर्ण होणार नाही. शिव व्याख्याते अविनाश पाटील

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  आपल्या महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्या संत परंपरेच्या त्यागानेच त्यांच्या कष्टाने त्यांच्या समर्पण भावानेच आपण आज वाटचाल करत आहोत या वाटचालीमध्ये अनेक वीर पुरुषांचाही मोठा सहभाग त्यांचे बलिदान असल्यामुळेच आपण आज सप्ताह साजरे करतो आहे .या महाराष्ट्रात माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय या महाराष्ट्राचा इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही असे प्रतिपादन शिवव्याख्याते अविनाश महाराज पाटील यांनी तळणी येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात केले जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसूनी देव न लगे देव न लगे साठवणीचे रुंदले जागे या अभंगावर निरूपण केले जगद्गुरु तुकाराम महाराज यांना गाथा निर्माण करताना अनेक संकटांना सामोरे जावं लागलं त्यासाठी अपार कष्ट तुकोबांना झेलावे लागले परंतु तो गाथा आपल्याला सहज मिळाला आहे त्याचा उपयोग आपण केला पाहिजे देहू परिसरातील डोंगरावर तुकोबांनी ज्ञानसाधना करून त्याच साधनेच्या जोरावर वैकुंठा गमन केले मनुष्याच्या जीवनात निस्वार्थ ...