दैठना येथे गॅसचा भडका, घर जाळून खाक घरासह संसार उपयोगी साहित्य नगदी दोन लाख रुपये रक्कम जळून खाक


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे 
तालुक्यातील दैठना खुर्द येथे दत्ता विष्णु सवने यांचे घरी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्याची आईने गॅस पेटवला असता गॅसचा भडका झाल्याने घरातील संस्कार उपयोगी साहित्य व नगदी रोख रक्कम जाळून खाक झाल्याची घटना दि २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शेतकरी दत्ता सवने यांच्या आई सकाळी घरी आठ वाजेच्या सुमारास चहा करण्यासाठी गॅस पेटवित असतांना अचानक भडका झाल्याने आगीने रोद्ररूप धारण करून लाकडी माळवद असल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. ग्रामस्थांनी आग विझविन्यासाठी अग्निशामक दलाल पाचारण करण्यात आले. अग्निशामक व गावकर्‍यांनी आग आटोक्यात आणली. गॅस टाकीचा विस्फोट न झाल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत घरासह घरातील एक किंट्टल गहू, ज्वारी, किराणा, कपाट, कपडे, लोखंडी टीन पत्रे, व नगदी रोख रक्कम दोन लाख तीन हजार रुपये जाळून खाक झाले. असा अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अग्निशामक दलाचे अधिकारी अनिल पारिख, फायरमन अमित कनाके, प्रशिक्षणार्थी सुनील काळे, संदीप हिवाळे, तसेच गावातील शिवाजी सवने, दीपक सवने, भागवत सवने, गणेश सवने, बंडू सवने, हरिभाऊ सवने, अमोल सवने, लक्ष्मीकांत सवने, विकास सवने, तातेराव सवने, प्रकाश सवने, वचीष्ठ भुंबर, विशाल सवने, प्रकाश सवने, दत्ता सवने, ज्ञानेश्वर सवने, बंडेराव ज्ञानेश्वर सवने, सरपंच सोनाजी गाडेकर, रंगनाथ सवने, आतिश गाडेकर, हरी गाडेकर, दत्ता सवने, भास्कर सवने, ईश्वर भुंबर, यांच्यासह आदींनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी तलाठी श्रीमती किरण जोशी, तसेच गॅस एजन्सी संचालक योगेश भोगल, दत्ता बाळकुंड, यांनी जाऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती