सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रामनगर येथे दोन गटात तुंबळ हाणामारी जोशी गटाने केलेल्या गोळीबारात विजय ढेंगळे गंभीर जखमी...


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 जालना तालुक्यातील रामनगर येथे राजकीय पूर्ववैमनस्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार झाला आहे .रामनगर येथील शेजुळ गट व जोशी या दोन गटांमध्ये सकाळी 11 वाजता तुंबळ हाणामारी झाली काही शुल्लक कारणावरून यांच्यात वाद झाला असून या मारामारी मध्ये जोशी गटाने गोळीबार केल्यामुळे प्रकरणाला मोठे स्वरूप प्राप्त झाले .जालना व परतूर येथून पोलीस मागवण्यात आले होते आरसीपी पोलीस दलाने सुद्धा आपली भूमिका निभावली आहे यावेळी जालना जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली त्यांनी घटनास्थळाचा सदरील पंचनामा करून शांतता राखण्याची विनंती केली होती .यावेळी जोशी गटातील सर्वांना पोलिस व्हॅनमध्ये टाकून मंठा येथे हलवण्यात आले पुढील कारवाई करण्यात आली या प्रकरणात विजय ढेंगळे यांच्या पोटात गोळी लागल्यामुळे उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. परतूरचे उपपोलीस अधीक्षक राजू मोरे यांनी जनतेल शांतता राखण्याचे आव्हान केले आहे .

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत