सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतुर नगरपालिकेच्या घरपट्टी वाढी विरोधात राष्ट्रवादीचे लक्षणिक उपोषण


परतूर,प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 परतूर नगरपालिका प्रशासनाने वाढवलेल्या घरपट्टी च्या विरोधात बुधवारी (ता. 20) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष कपिल आकात यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
                 यावेळी मुख्यआधिकरी याना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, तत्कालीन नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांच्या कार्यकाळात कर वाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. जी कर वाढ करण्यात आली आहे ती सामान्य जनतेला न परवडणारी आहे. या करवाढीला तत्कालीन नगरसेवक अंकुश तेलगड यांनी विरोध देखील केला होता.असे पण या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर मा नगराध्यक्ष विनायक काळे,अंकुश तेलगड,विजय राखे, संतोष चव्हाण, आरिफ अली,कदिर कुरेशी,सत्तार कुरेशी, संजय राऊत,परवेज देशमुख,शिवशंकर स्वामी,रजाक कुरेशी आदींच्या साह्य आहेत.

दर चार वर्षाला घरपट्टी ची करवाढ करणे अनिवार्य असते. तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत ठराव घेऊन ही करवाढ करण्यात आली आहे. ही कर वाढ नियमबाह्य नाही.
 सुधीर गवळी ,मुख्याधिकारी, परतूर

नगरपालिका प्रशासनाने जी कर वाढ केली आहे ती सामान्य जनतेच्या खिशाला परवडणारी नाही. तात्कालीन नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांनी हेतुपुरस्कर ही कर वाढ केली आहे.
 विनायक काळे ,मा.नगराध्यक्ष,परतूर


Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत