सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

 परतूर / प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
       शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत परतूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय चिखले, शरद भारुका, प्रभाकर सोळंके यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला 
      आज दिनांक 19 आगष्ट रोजी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी बोराडे सह मंठा पंचायत समितीचे माजी सभापती संतोष वरकड, परतूर उपतालुकप्रमुख सुदर्शन सोळंके, विकास खरात, सुनील सुरुंग या प्रमुख नेत्यांची उपस्तीती होती. या प्रवेश सोहळ्यात आपल्या भावना व्यक्त करताना ऐ जे बोराडे यांनी म्हटले की, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व तमाम शिवसैनिकाना मान्य असून, कोणी कितीही कट कारस्थाने केली तरी शिवसेनेचे अस्तिसत्व कोणीच संपवू शकत नाही, स्व बाळासाहेबांच्या विचारांचा हा झंझावत पुढे असाच चालू राहणार असून जे गदार झाले ते भविष्यात उघडे पडतील , जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असे म्हणत परतूर विभागात अनेक जण मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत