सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने रमेश कुडे सन्मानित


 मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
    दि. १८ मंठा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हेलस येथील मुख्याध्यापक श्री.आर.बी.कुडे यांना त्यांचे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे तसेच शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात गोडी निर्माण करणारे, विद्यार्थी प्रिय, तालुक्यामध्ये शिस्तप्रिय म्हणून अशी ओळख असणारे व त्यांनी केलेल्या राष्ट्रीय कार्याबद्दल रयतेचा कैवारी शिक्षण भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र ,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. डीडी विसपुते महाविद्यालय विचुंबे, पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी श्री महेंद्र विसपुते यांचे अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. प्रसंगी श्रीमती मनीषा पवार मॅडम शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग .श्रीमती पालकर मॅडम उपशिक्षणाधिकारी रायगड .श्री राजेश सुर्वे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष,श्री शाहू भारती संपादक दैनिक रयतेचा कैवारी व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मंठा शहरांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व नातेवाईक,मित्रपरिवार त्यांच्याकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत