सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शेतकऱ्याच्या शेत रस्त्याचा प्रश्न सोडवण्याची कैलास सरकटे यांची मागणी


मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
मंठा तालुक्यात ग्रामीण भागातील सर्वच शेतकऱ्यांची शेत रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे शेतकऱ्यांना कायम स्वरूपी रस्ताचे जाळे निर्माण करुन दिल्यास शेत मालाची वाहतूक करता येणार आहे. शेतकऱ्यांचे शेत रस्त्याचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष कैलाश सरकटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री. विधानसभा अध्यक्ष. व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे कि ग्रामीण भागात अनेक शेत रस्त्याच्या संदर्भात अनेक ठिकाणी वाद .भांडण कोर्ट मध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात ते न्यायालयापर्यंत कितेक दिवस चकरा माराव्या लागतात .यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट येत आहे. प्रत्येक ठिकाणी नंबर बांध आहे. बांधावरुन जाण्यासाठी रस्ता देणे आवश्यक आहे. पुर्वी सर्वे .नंबर हा एकाच मालकिचा असायचा किंवा एकाच कुटुंबातील असायचा पण वाटणी किंवा रजिस्ट्री झाली की वाद निर्माण करण्यात येतात. त्यामुळे रजिस्ट्री व वाटणी पत्रक करतानी त्या दस्तावेज मध्ये नोंद होणे गरजेचे आहे. त्या नंबर बांधावरुन जो रस्ता आवडेल त्या व्यक्तीला शासनाने गुन्हा दाखल केला जावा किंवा तहसीलदार व न्यायालयाचा वेळ घातल्या बद्दल काही दंड आकारण्यात यावा. तहसील कार्यालयात नंबर बांध; सर्वे नंबर; व सरबांध एकच असतो ह्यामध्ये शेतकऱ्यांना समजून घ्यावं. अनेक ठिकाणी महीला समोर करुन संबधीत शेतकऱ्यांवर छेडछाडीचे गुन्हा दाखल केला जातो. समोरचा शेतकरी जर एसी. एसटी असेल तर जातीवाचक गुन्हा दाखल केला जातो. ह्या सर्व बाबतचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक ; नैराश्य ; आपमास्पद वागणुकीतुन आत्महत्या सारखं पाऊल उचलल्या पासून थांबवावे असे निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष कैलाश सरकटे यांनी सांगितले आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत