सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतुर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रास्त भाव दुकानदाराचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन..

.
परतूर प्रतिनिधी हनुमान दवंडे
परतुर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रास्त भाव दुकानदार संघटना परतुर यांच्या वतीने विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने अन्नधान्य वाटप करताना शासनाकडून सद्यस्थितीत कमी प्रमाणात कमिशन देण्यात येते. सदरचे कमिशन स्वस्त धान्य दुकानदार यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे कठीण झाले आहे. 
   तसेच ई.पास मशीन मध्ये स्वतंत्र तांत्रिक अडचणी असल्यामुळे ग्राहकाचा नाहक रोज सहन करावा लागत आहे. व स्वस्त धान्य दुकानामधील अन्नधान्य वाटप करण्यासाठी दोन ते तीन मजूर लागतात तसेच शासनाकडे येणारे कमिशन हे सुद्धा वेळेवर मिळत नाही या सर्व बाबींचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र शासनाने देशातील वैयक्तिक नावावरील रेशनिंग परवाने महिला बचत गट व अन्य स्थानिक संस्थांना देण्याच्या घेतलेल्या निर्णयास विरोध करण्यात येत आहे. स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मार्जीन (कमिशन )मध्ये वाढ करण्यात यावी. व वर्ल्ड फुड प्रोग्रामच्या शिफारसी त्वरित स्वस्त धान्य दुकानदारांना लागू करण्यात याव्या त स्वस्त धान्य दुकानदाराला एक टक्के घट मंजूर करण्यात यावी. अन्य मागण्याही मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी रास्त भाव दुकानदार संघटना परतुर यांनी केली आहे . यावेळी उपस्थित राजाराम रंगनाथराव कांबळे स्वस्त भाव दुकानदार संघटना सचिव परतुर ,नामदेव भगवानराव तनपुरे तालुका अध्यक्ष प्रकाश परतूर, कोंडीबा साळवे उपाध्यक्ष, सुकलाल राठोड ,संघटक गणेश भगवानराव हनवते ,सहसचिव अंकुश बिडवे, सदस्य गोविंद काळे , आदी स्वस्त धान्य दुकानदार उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत