सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पीक कर्जासाठी ऑनलाइन ऐवजी गाव स्तरावरच ऑफलाइन पद्धत राबवा, भाजपा युवा मोर्चाची मागणी


 
परतूर (प्रतीनीधी) पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पीक कर्जाचे अर्ज गाव स्तरावर तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परतूर तालुका भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आली आहे. 
माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या सूचनेवरून तसेच युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे. 
कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात सगळीकडे संचार बंदी लागू आहे. ग्रामीण भागात ऑनलाइनच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.अशा स्थितीत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. अर्ज ऑनलाइन करण्यासाठी शेतकाऱ्यांकडून १०० रुपये एवढे शुल्क खाजगी दुकानदारांकडून आकारले जाते. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय एकाच वेळी अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी येत असल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. वरील सर्व अडचणी लक्षात घेऊन पीक कर्जासाठी प्रत्येक गाव स्तरावर नियुक्त तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या कडे पीक कर्जाचे प्रस्ताव स्वीकारण्याची व्यवस्था करावी, जेणे करून शेतकऱ्यांना गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही. गावामध्ये कागदपत्रांची जुळवा जुळव करणे सोपे जाईल.
गावस्तरावर जमा झालेले अर्ज प्राधान्यक्रमानुसार बँकेत जमा करावे, बँकांनी त्यांच्या कडे आलेल्या अर्जावर कार्यवाही करून एका एका शेतकऱ्याला बँकेत बोलवावे. बँकेत होणारी गर्दी या मुळे कमी होण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन जिल्ह्याधिकारी आणि अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी ऑनलाईन अर्जांची पद्धत बंद करून ऑफलाईन पद्धतीने गाव स्तरावर अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेदनावर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शत्रुघन कणसे भाजपा तालुका उपाध्यक्ष वसंतराव बेरगुडे नगरसेवक प्रकाश चव्हाण,कृष्णा अरगडे सरपंच केशव ढवळे,बंडू भुंबर,विकास सवणे,सिद्धेश्वर बोरकर,केशव आघाव, प्रकाश सवणे, संजय अवचार, हनुमंत चिखले,गणेश कणसे आदींची  उपस्थिती होती.

फोटो ओळी : परतूर येथील एसबीआयचे  शाखा व्यवस्थापक रवींद्र डोंगरे यांना आपल्या मागण्याचे निवेदन देतांना युवामोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, भाजपा ता.उपाध्यक्ष वसंतराव बेरगुडे, नगरसेवक कृष्णा आरगडे, केशव ढवळे, बंडू भूंबर.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत