सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

रामनगर सर्कलमधील तरुणांचा मनसे विद्यार्थी सेनेत प्रवेश



जालना(प्रतीनीधी) जालना तालुक्यातील रामनगर सर्कलमधील तरुणांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनसे राज्य सरचिटणीस तथा मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली   महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे, जालना तालुका अध्यक्ष सचिन एरंडे, मनसे जालना तालुका ऊपाध्यक्ष कृष्णा खलसे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मनसे विद्यार्थी सेना मध्ये जाहिर प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या विचारधारेवर आपण ठाम राहुन तरुणांना सोबत घेऊन आपण पुढची वाटचाल जोरात करणार असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेेमध्ये रामभाऊ कातकडे, गणेश कातकडे, आरूण नागवे, विलास काटकर, भगवान काटकर, सिध्देश्वर खांडेभराड, अनिल कातकडे, गजानन लोखंडे, योगेश नागवे, प्रदिप खांडेभराड, संजय  खांडेभराड, प्रकाश खांडेभराड, बालाजी शेळके,अमर जाधव, दिपक राऊत,विष्णू कुंडकर विलास डुकरे, खांडेश्वर गायकवाड, निवृत्ती भालेकर, कृष्णा काटकर, सचिन चौधरी,  आदि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत