लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

नारियलवाले मारहाण प्रकरणातील पोलीस निलंबित करा -- काकडे



मंठा(प्रतीनीधी)
जालना शहरामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व पोलीस कर्मचाऱ्यांची गुंडगिरी दिनांक 27 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. शिवराज नारियलवाले या भाजपाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी लाठ्या-काठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केली होती. या घटनेचा आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेधही व्यक्त केला. भविष्यामध्ये पोलिसांची दादागिरी ही सर्वसामान्य लोकावर दिसून येऊ नये. म्हणून या गोष्टीला आवर घालण्यासाठी पोलिसांची वाढलेली गुंडगिरी थांबवण्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन देऊन या घटनेतील संबंधित पोलिस अधिकारी कर्मचारी यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आपण केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी माहिती दिली आहे. कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, हि झालेली अमानुष मारहाण व तो बघितलेला व्हिडिओ कोणताही मनुष्य सहन करणार नाही. इतक्या विचित्र पद्धतीने मारहाण करण्याचे आदेश कोणाचे होते? हे सुद्धा तपासणी करणं महत्त्वाच आहे. पोलिसच जर कायदा हातात घेत असतील तर सर्वसामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा सवालही मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी उपस्थित केला आहे. या घटनेची पुढील कार्यवाहीसाठी आपण मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने राज्याचे गृहमंत्री, जालना पोलीस अधीक्षक, विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करून शिवराज नारियलवाले यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही. तो पर्यंत आवाज उठवत राहणार असल्याचेही सिद्धेश्वर काकडे यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत