Posts

Showing posts from October, 2021

शिवसेनेच्या मेळाव्याला अधिक संख्येने उपस्थित राहा - मोहन अग्रवाल

Image
परतूर (प्रतीनीधी): आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तालुक्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी सकाळी ११ वाजता शहरातील वरद विनायक लोन्स येथे करण्यात आले आहे. राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते केले जाणार आहे. या मेळाव्याला जिल्हा संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, परभणीचे खासदार संजय जाधव, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार तथा पंचायतराज समितीचे अध्यक्ष डॉ.संजय रायमुलकर, माजी आमदार शिवाजीराव चोथे, जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, बुलडाणा जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, रामेश्वर नळगे, उपजिल्हा प्रमुख माधवराव कदम, बाबासाहेब तेलगड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. तालुक्यातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांनी केले. शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्ह

भानुदासराव चव्हाण वरीष्ठ महाविद्यालयात लसीकरण शिबीर संपन्न

Image
परतूर - दिनांक  29आक्टोबर 2021 रोजी येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग  व  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र मार्फत मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत कोव्हक्सिन लसीकरण कार्यक्रम यशस्वी पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. दिनकरराव चव्‍हाण  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ज्ञानदेव नवल (वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, परतुर),  डॉ. दीपक तारे (नोडल अधिकारी लसीकरण ग्रा. रुग्णालय परतुर)  तसेच महाविद्यालयाचे संचालक मा. श्री. संतोष चव्हाण , प्राचार्य शंकर चव्हाण  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा. प्रदीप चव्हाण, याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. लिंबाजी कदम ,श्री गजानन कास्तोडे  उपस्थित होते. या प्रसंगी वैद्यकीय रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या लसीकरण शिबिरास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.  एकूण  63 व्यक्तींना लस देण्यात आली. या लसीकरण कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्

आमदार लोणीकर यांचा एसटी कामगारांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा,दिवाळीपूर्वी एसटी कामगारांच्या मागण्या मान्य करा नसता विधान भवनात सरकारची लक्तरे वेशीवर टांगू,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा इशारा

Image
प्रतिनिधी परतूर येथे एसटी कामगारांच्या विविध मागण्या संदर्भामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पाठिंबा दिला असून दिवाळीपूर्वी एसटी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करा नसता विधान भवनामध्ये सरकारची लक्तरे वेशीवर टांगूत असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे    या पत्रकार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पुढे म्हटले आहे की कोरोना संकटाच्या काळामध्ये या एसटी कामगारांनी खूप मोठी सेवा केली आहे मात्र हे राज्यातील सरकार यांच्या मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून यामुळे राज्यभरामध्ये 28 कामगारांनी आत्महत्या केल्या सत्तेच्या नशेत मशगुल असणाऱ्या सरकारला तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कामगारांचे दुःख दिसत नसून अतिशय अल्प वेतनावर काम करणाऱ्या अनेक राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांव कर्जाचा डोंगर आहे अशातच प्रशासन व राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे देय असलेले घर भाडे नियमानुसार बसणारा ग्रेड पे देण्याचे मान्य करण्यात आलेली असूनही सरकार मात्र जाणीवपूर्वक या कामगारांचा छळ करीत असल्याचा आरोप माजी मंत्री

जलयुक्त शिवारला राज्यसरकार क्लीनचिट म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचं काम सर्वोत्तम यावर महा विकास आघाडीचे शिक्कामोर्तब- माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,जलयुक्त शिवार वरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर चिखलफेक करणाऱ्यांना चपराक-लोणीकर

Image
देगलूर(प्रतीनीधी) तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे जलयुक्त शिवार सारखे महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास गेले असून शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण न करता देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाऊ शकते व त्याचा उपयोग शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो जलयुक्त शिवार योजनेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता अत्यंत प्रामाणिकपणे केवळ शेतकऱ्यांसाठी काम करण्यात आले होते जलयुक्त शिवार योजनेला मिळालेला क्लीनचिट मुळे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सरकारचं काम सर्वोत्तम होतं यावर विद्यमान महा विकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केला आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवारला आज जलसंधारण विभागाकडून क्लीनचिट मिळालेली आहे. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या योजनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत महा विकास आघाडी सरकारने आग्रह धरला होता त्या आग्रहाखातर जलयुक्त शिवार योजनेची तपासणी करण्यात आली या योजनेमुळे पाणी पातळी कमी झाली शेतकऱ्यांचं नु

ग्राहकांनी डिजिटल सेवांच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करावा-क्षेत्रीय प्रबंधक अभिजीत पांगरीकर यांचे आवाहन

Image
  परतूर ( प्रतिनिधी) आजच्या आधुनिक काळात ग्राहकांनी बँकिंग व्यवहार करतांना डिजिटल सेवांच्या माध्यमातून कॅशलेश व्यवहार करून बँकिंग सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसबीआय बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक अभिजीत पांगरीकर यांनी केले. परतूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहक मेळाव्यात ग्राहकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जालना विभागीय मुख्य प्रबंधक अभिनय भांबुर्डेकर, प्रबंधक अतुल सावजी, उपविभागीय पोलिस अधिकारी आर.डी. मोरे, मुख्य शाखा व्यवस्थापक सुधीरकुमार वाकोडे, एकनाथ कदम उपस्थित होते. यावेळी संवाद साधतांना क्षेत्रीय प्रबंधक अभिजीत पांगरीकर म्हणाले की ग्राहकांने आजच्या डिजिटलच्या जमान्यात वावरत असतांना बँकेच्या डिजिटल सेवांची माहीती घेऊन कॅशलेश असा सुलभ व्यवहार करावा. यामधून वेळ आणि मेहनत वाचणार आहे. बँकच्या अधिकृत घोषित केलेल्या अपचा वापर करावा. बँक ग्राहकांच्या सुरक्षा आणि हितासाठी तत्पर आहे.      तसेच प्रबंधक अतुल सावजी बोलताना म्हणाले की बँकिंग डिजिटल सेवा मध्ये कार, गृह, यासह आदि कर्ज योजना या डिजिटल बँकिंग सेवामध्ये समाविष्ट केल्या आहेत. आणि बँकेत होणारी ग

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे भाकीत खरे ठरले, पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांचे अर्ज फेकले उसाच्या शेतात,राज्य सरकारने दलाली खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही- लोणीकर यांचा सरकारवर हल्लाबोल

Image
देगलूर(प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शेतकरी संवाद दरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास तयार नाहीत राज्य सरकारने यामध्ये दलाली खाल्ली आहे असा घणाघाती आरोप केला होता ऑनलाईनचा फार्स निर्माण करून शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा नाही अशी कंपनीची मानसिकता असल्याचे देखील त्यावेळी लोणीकर यांनी सांगितले होते शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाइन होत नसतील तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज जमा करा संबंधित अधिकाऱ्यांकडे तहसील कार्यालयात येऊन जमा करा व प्रत्येक अर्जाची पोच पावती घ्या अन्यथा पीक विमा कंपन्या तुमचे अर्ज गोदावरीच्या बंधाऱ्यात फेकून देतील आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असे म्हटले होते ती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे हे भाकीत तंतोतंत खरे ठरले असून  आंतरगाव ता.नायगाव जि.नांदेड येथील शेतकऱ्यांचे पिक विमा कंपनीकडे भरण्यात आलेले ऑफलाईन अर्ज कंपनीने चक्क उसाच्या शेतात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने पिक विमा कंपनीशी केलेल्या करारामुळे पिक विमा कंपन्या मालक आणि दलाली खाणारे राज्य सरकार गुलाम झाले

दलाली खाल्ल्यामुळे पिक विमा कंपन्या मालक आणि राज्य सरकार गुलाम बनले - माजी मंत्री आमदार बबनराव लोणिकर,अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, पिक विमा कंपनीशी केलेल्या चुकीच्या कराराबाबत राज्यसरकारच जबाबदार - लोणीकर

देगलूर(प्रतिनिधी) पिक विमा कंपनी राज्य सरकारशी करार केलेला आहे तो करार करताना राज्य सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने करार केला आहे या करारानुसार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या यंत्रणेने केलेले पंचनामे पीक विमा कंपन्यांना मान्य नाहीत त्यामुळे पीक विमा कंपनी मालक आणि राज्य सरकार गुलाम बनले आहे अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला पिक विमा कंपनीशी करण्यात आलेल्या चुकीच्या कराराबाबत केंद्र सरकार जबाबदार असून केंद्र सरकार मुळीच पिक विमा मिळत नाही असा आरोप काल अशोक चव्हाण यांनी देगलूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत केला होता समाचार घेताना लोणीकर यांनी अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप खोडून काढा राज्यसरकारने दलाली खाऊन पिक विमा कंपन्यांचे गुलाम बनले आहेत असा घणाघाती आरोप केला. तत्कालीन मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पिक विमा कंपन्यांशी केलेला शेतकऱ्यांच्या हिताचा होता म्हणून सातत

देगलूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित !,सुभाष साबणे २० हजाराच्या मताधिक्क्याने निवडून येणार - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
देगलूर(प्रतीनीधी) भारतीय जनता पार्टीने देगलूर विधानसभा निवडणुकी साठी लागणारी सर्व तयारी पूर्ण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाषराव साबणे वीस हजार मतांच्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास देगलूर विधानसभा निवडणुकीचे प्रभारी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी देगलूर विधानसभा मतदारसंघ सर्कल निहाय कॉमेंट बैठका घेण्यास सुरुवात केली असून प्रत्येक गावातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे लोणीकर यांनी सांगितले भारतीय जनता पार्टी वर लोकांचा विश्वास असून त्यामुळेच पंढरपूर मध्ये कधीही न जिंकलेली जागा सुद्धा यावेळी तिन्ही पक्ष एकत्र असताना भारतीय जनता पार्टीने जिंकली त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा देगलूर विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून होणार असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष साबणे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार आहेत असे मत निवडणूक प्रभारी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागव

अतिवृष्टीने नुकसान झालेली फुलशेती बागायती प्रमाणे नुकसान भरपाई द्या

Image
  परतूर (प्रतीनीधी) तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात फुलाची लागवड करून फूल उत्पादन करीत आहेत. यावर्षी मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने फूल शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करतांना फुलशेती ही जिरायती म्हणून पंचनाम्यात नोंद घेण्यात आली आहे. फुलशेतीला बागायती प्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी फूल उत्पादक शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.    यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी फुलशेती करीत आहेत. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आपली उपजीविका भागवत आहेत. परतूर, बामणी, शेलवडा, वलखेड, सोयंजना, हरेराम नगर, सिरसगाव, श्रीष्टी, वरफळवाडी, चिंचोली, रेवलगाव, सालगाव, उस्मानापूर, वैजोडा, यासह आदि गावात शेतकरी फुलशेती करीत आहेत. मागील सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. फुलशेतीचे पंचनामा प्रशासनाने करतांना जिरायती शेती म्हणून पंचनाम्यात नोंद केली आहे. फुलशेती करतांना शेतकर्‍यांना बागायती शेती प्रमाणे मुबलक पाणी लागते. यामुळे फुलशेती जिरायती नोंद न घेता बागायती क्षे

पाटोदा येथे राहुल लोणीकर यांच्या हस्ते युवकांचा सत्कार संपन्न

Image
परतूर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाटोदा (माव) येथील तरुणांनी नवरात्र काळात तुळजापूर येथे पायी जाऊन मंदिरातील  पेटती ज्योत घेऊन तरुणाचा जथा आल्यावर भाजपा युवा मोर्च्याचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.      पाटोदा येथील तरुणांनी नवरात्र काळात तुळजापूर येथे पायी जाऊन मंदिरातील  पेटती जोत घेऊन एका दिवसात परत येऊन २५० किलोमीटरचे अंतर पायी चालून यशस्वी पार केल्या मुळे हा विषय  संपूर्ण तालुक्यात चर्चाचा  ठरला होता. याची दखलं घेत प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी  त्या तरुणांना प्रेरणा मिळावी या करीता पाटोदा येथे भेट घेत त्या युवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश शिंदे, गोकुळ खवल, चक्रधर क्षीरसागर, कृष्णा लहाने, शिवाजी खवल, यांच्यासह वीस तरुणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संपत टकले, शत्रूघ्न कणसे , लक्ष्मण शिंदे, संभाजी  खवल, सदाशिव  खवल, संभाजी शिंदे , भीमराव शिंदे, सुरेश पाटोदकर, सी.एन. खवल, लक्ष्मण क्षीरसागर, यांच्या सह  अनेकांची  उपस्थिती होती.

१० हजार कोटीचे पॅकेज म्हणजे लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय काही नाही, प्रत्यक्षात मिळणार याची शाश्वती नाही - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची टीका*

 

मिशन कवच कुंडल अभियान अंतर्गत मुस्लिम मौलविंची बैठक संपन्न.,इंदरानगर येथे प्रभारी नगराध्यक्ष खतीब यांच्या हस्ते मिशन कवच कुंडलअंतर्गत लसीकरणाचे उद्घाटन संपन्न

Image
  परतूर (प्रतीनीधी) दि १३ रोजी न.प. परतूर चे मुख्याधिकारी सूधीर गवळी  , वैद्यकिय अधिकारी डॉ. डी.आर. नवल  यांच्या उपस्थितीत मिशन कवच कुंडल अभियान कोविड -१९ लसिकरण अंतर्गत मुस्लिम मौलविंची बैठक संपन्न झाली. या मधे  शहरातील सर्व समाज बांधवांना लसिचे महत्व पटऊन सांगितले व लसिकरण करण्या करिता प्रोत्साहन करण्या करिता या सभेचे आयोजन करण्यात आले होते.    या बैठकिस मुख्यधीकारी गवळी , वैद्यकिय अधिकारी डॉ. नवल , प्रभारी नगराअध्यक्ष सादेक खतीब, कार्यालयीन अधिक्षक चव्हाण , ऊबेद चाऊस,  सावंत ,  नगरसेवक अंकुशराव तेलगड, अखील काजी, खलील काजी , बाबुराव हिवाळे, रहिमोद्दीन कुरेशी, अनिल पारिख यांच्यासह नप व वैद्यकिय कर्मचारी उपस्थित होते     तद्नंतर परतूर शहरातील प्रभाग क्र1 इंदिरा नगर मध्ये  मुख्याधिकारी सुधिर गवळी  व वैधकिय अधिकारी डॉ नवल साहेब यांच्या नेतूतवाखाली मिशन कवच कुंडल अंतर्गत लसी करणांचे शिबीर आयोजित करण्यात आले या शिबीराचे उदघाटन प्रभारी नगराध्यक्ष सादेक भाई खतिब यांच्या हस्ते झाले  यावेळी मुख्य धिकारी सुधिर गवळी  वैद्यकीयधिकिरी डाक्टर नवल ,माजी नगर सेवक आर के खतिब  न

विविध सामाजीक उपक्रमांनी शरद पाटील यांचा वाढदिवस साजरा

Image
तळणी (तळणी )येथील प्रसिद्ध युवा उद्योगी शरद पाटील याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तळणी येथील मित्र परीवारानी विविध सामाजिक  उपक्रम राबवून साजरा केला यामध्ये ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराना सँनिटायझरचे व मास्क चे वाटप करण्यात आले तर विश्वनाथ विद्यालय येथील विद्यार्थ्याना वही पेन वाटप करण्यात आले तर गजानन महाराज मंदीर परीसरात वृक्षारोपण करण्यात आले युवा उद्योजक शरद पाटील यांचा वाढदीवस दरवर्षी विविध सामाजीक व गरजूना मदत देऊन साजरा करण्यात येत असतो कोरोना महामारी मुळे गेले दोन वर्षामध्ये अनेक गरजूना धान्य किट वाटप करून आपण ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेने हे उपक्रम तळणी येथे साजरे होतात यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष्य ज्ञानेश्वर सरकटे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष्य नितिन सरकटे शिवसेनेच ज्ञानेश्वर सरकटे भिमशक्तीचे गौतम सदावर्ते प्रहार चे रितेश चंदेल भगवान देशमुख केशव खंदांरे एस पी लोन्ढे राजेद्र सानप विष्णू वाघ अशोक राठोड बबन माने आदी सर्व मिञ मंडळी उपस्थीत होते

शहरात फोफावत आहे साथरोग* *नगरपालिकेने धुरफवारणी करावी-ईजरान कुरेशी

Image
        परतुर(प्रतिनिधी) कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतांनाच गेल्या आठ दिवसापासून शहरात साथ रोग फोफावत आहे. यात मलेरिया, डेग्यू, काविळ सारख्या आजारांचा समावेश आहे.यामुळे शहरातील इंदिरानगर भागातील ११ वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.नगरपालिकेने आठ  दिवसात संपुर्ण शहरात धुरफवारणी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईजरान कुरेशी यांनी केली आहे.  विशेषतः खासगी रुग्णालयात या आजारांच्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.शहरात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. मार्च ते जून या चार महिन्यात कोरोना संसर्गाचे हजारो रुग्ण आढळून आले. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात कोरोना रुग्णाचा आकडा एका संख्येवर आला आहे. त्यामुळे कोरोनासाठी लागू केलेले निर्बंध हटविण्यात आले. कोरोना अटोक्यात येत नाही तोच शहरात साथीच्या आजाराने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठ दिवसापासून शहरात मलेरिया, डेंग्यू, काविळ, चिकुन गुणियाचे रुग्ण मोठया संख्येने आढळून येत आहे. खासगी रुग्णालयासह दवाखान्यात देखील रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. पावसामुळे रस्त्याच्या बाजूला आणि मोकळया जागा, घ

रायपुर रेल्वे गेटजवळील पुलाची दुरुस्ती करा; नसता रेल रोको आंदोलन करणार-रमेश भापकर

Image
             परतुर(प्रतिनिधी) रेल्वे प्रशासनाकडुन रस्ता क्रमांक प्रजिमा 27 व रेल्वे गेट क्रमांक 93 या रेल्वे गेटवर भूमिगत पुलाचे काम करण्यात आले आहे. या दरम्यान सदरील पुलाचे काम बोगसरित्या करण्यात आले असुन यावेळी पूलाच्या आजु-बाजुने पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्थित पर्यायी नालीची व्यवस्था करण्यात आली नसल्याने या पुलाच्या खाली ५ फुटांपर्यंत पाणी जमा होत आहे.रायपुरसह इतर गावांना ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आज सकाळी माजीमंत्री बबनराव लोणीकर,युवामोर्चा महामंत्री राहुल भैय्या लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  भाजपच्या वतीने परतुर रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रमेश भापकर यांनी रेल्वे प्रबंधकाला निवेदन सादर केले.त्यात सदरील पुलाची आठ दिवसात पुलाची दुरुस्ती करावी नसता भाजपच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी संपत टकले,शत्रुघ्न कणसे,अशोक बरकुले,शिवाजी पाईकराव,विष्णु बरकुले,उध्दव बरडे,डॉ.रविंद्र बरकुले,दत्तराव रायकर,प्रभाकर जाधव,तुकाराम मांटे,अशोक अंभोरे,उध्दव शेरे,सतिश सस्ते,पं

पुरस्कप्रश्नांच्या सोडवणुकी सोबतच शिक्षकांच्या चांगल्या कामाचे कौतुक गरजेचे ,परतूर येथील शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र काकडे यांचे प्रतिपादन

Image
परतूर : शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांची, समस्यांची सोडवणूक जरूर व्हावी, या सोबत चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जावा. अधिक चांगले काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करता यावे यासाठी हा पुरस्कार असून खरे काम करणाऱ्या शिक्षकांचा हा प्रातिनिधिक स्वरूपातील सन्मान असल्याचे मत जिल्हाध्यक्ष डॉ. रविंद्र काकडे यांनी मत केले. आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या परतूर शाखेच्या वतीने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात आयोजन शहरातील मराठा क्रांती भवन येथे रविवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते, यावेळी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला सुखदेव चव्हाण, बाल शिक्षण तज्ञ नूतन मघाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानदेव नवल, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, प्रा.पांडुरंग नवल, गटसमन्वयक कल्याण बागल, बाबासाहेब भापकर, विष्णू वाघमारे, अरुण भांडवलकर, कैलास उफाड, सुरेश तोटे, सोमनाथ उदेवाळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.       कोरोना काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्या बरोबर कुटुंबांचे आरोग्य संरक्षण असो इतर कुठ

परतूर तालुक्यातील 25 शिक्षकांना मिळणार आदर्श शिक्षक,शिक्षकरत्न,शिक्षक समाजभुषण पुरस्कार

परतूर/प्रतिनिधी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या परतूर शाखेच्या कार्यकारणीची बैठक जिल्हाकार्यध्यक्ष प्रा.विष्णु वाघमारे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भापकर,ता सचिव सुरेश तोटे,तालुका नेते कैलास उफाड,शिवाजी भानुसे,अरुण भांडवलकर,ता.उपा.राजेश लोखंडे,तुकाराम आकात,ता.कोषाध्यक्ष सोमनाथ उदेवाळ,राहुल सरकटे,सह सचिव गौतम गणकवार,अंकुश चिखले,ता.सं.राम काळदाते,जितेंद्र गायकवाड,,सोपान वडेकर,विनोद सातोनकर,बाबासाहेब गायकवाड,विजय सावंत,ता.प्र.प्रमुख एजाज देशमुख,शेख नजर,पूरुषोत्तम चाटे,भारसाकळे,भदर्गे ज्ञानोबा लहाने,इंद्रजित भगस,प्रकाश आढे,यांच्या उपस्थित पार पाडली त्यात शैक्षणिक वर्षे 2019-2020 व 2020-2021 मध्ये परतूर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय कार्यात भरघोस योगदान देणाऱ्या 22 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर एका शिक्षकाला शिक्षकरत्न व दोन शिक्षकांना शिक्षक समाजभुषण पुरस्काराने गौरविण्याचे घोषित करण्यात आले मागील एक महिन्यापासुन पुरस्कार निवड समितीने मागील दोन वर्षाच्या शिक्षकाच्या शैक्षणिक,सामाजिक,राष्ट्रीय कार्याचे मुल्यमापन करून तालुका जिल्हा कार्यकारणीकडे प्रत्येक केंद्रातुन व 2019