सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मंठा महा.विज वितरण कंपनीचा मनमानी कारभार,नागरीक त्रस्त


 मंठा(सुभाष वायाळ)मंठा महा. विज वितरण कंपनी मंठा शहरातील व खेड्यातील त्यांना हवे तेव्हा शहरातील व खेड्यातील वीज पुरवठा खंडित करतात. दिनांक 13 वार सोमवार रोजी दिवसभर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.ते वीज पुरवठा खंडित करत असताना कुठल्याही प्रकारची नागरिकांना व व्यवसायिकांना पूर्वसूचना देत नाहीत. त्यामुळे विज वर अवलंबून असणाऱ्या  छोट्या व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होऊन   त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. व मोठ्या व्यवसायिकांना वीज वर अवलंबून असणारे व्यवसाय त्यांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. आज जवळपास सर्वच व्यवसाय हे विजेवर अवलंबून आहेत. त्या सर्वांना तोटा सहन करावा लागत आहे. व अत्यावश्यक सेवा मध्ये असणारी सर्व क्षेत्रांना सुद्धा वीज पुरवठा खंडित चा परिणाम होत आहे. घरगुती वीज वापरणाऱ्यानाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापुढे वीज पुरवठा खंडित करत असताना नागरिकांना पूर्वसूचना देण्यात यावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे पूर्वसूचना न दिल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली. वरिष्ठ अभियंता यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत