लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

सरपंच परिषदेच्या एकदिवशीय संपात राज्यातील सर्व संगणकपरिचालक सहभागी होणार – सिद्धेश्वर मुंडे,संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा देऊन ग्रामपंचायत मध्ये सामाऊन घेण्याची मागणी



जालना(समाधान खरात)सरपंच परिषद,मुंबई महाराष्ट्र या सरपंच संघटनेच्या वतीने अनेक मागण्यासाठी २२ डिसेंबर २०२१ रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून या सरपंचांच्या मागण्या बरोबरच csc –spv या कंपनी कडून नियुक्त असलेल्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर सामाऊन घेऊन कर्मचारी दर्जा व किमान वेतन राज्य सरकारने देण्याची मागणी असल्याने सरपंचांच्या मागण्याना व आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने घेण्यात आला असून या संपात राज्यातील २८००० ग्रामपंचायती मध्ये काम करणारे संगणकपरिचालक सहभागी होणार असल्याचे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.
       याबाबत सविस्तर वृत्त की राज्यातील सरपंचांच्या अनेक मागण्या शासनाकडे प्रलंबित असून अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे,त्यामुळे मुंबई येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरपंच परिषद,मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने अनेक मागण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेऊन एकदिवशीय संप करण्यात येणार आहे,यात प्रामुख्याने गावाच्या विकासासाठी आलेल्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी csc –spv ही कंपनी आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून हडप करत आहे,त्यात ग्रामपंचायतीचे तर नुकसान होताच आहे परंतु महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुण –तरुणी असलेल्या संगणकपरिचालकांची मागील १० वर्षापासून आर्थिक पिळवणूक होत आहे.त्यामुळे या प्रकल्पात भ्रष्टाचार करून वित्त आयोगाचा निधी हडप करणार्या् csc –spv या कंपनीला आपले सरकार प्रकल्पातून बाजूला करून संगणकपरिचालकांचा समावेश ग्रामपंचायतीच्या आकृतीबंधात करून राज्य शासनाने किमान वेतन द्यावे ही मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.हीच मागणी सरपंच परिषद,मुंबई महाराष्ट्र यांनी या संपाच्या माध्यमातून केली असून सरपंच संघटनेच्या या एकदिवशीय आंदोलनात राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणकपरिचालक सहभागी होऊन पाठिंबा देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत