हे हिंदवी स्वराज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला सरकारच्या परवानगीची गरज नाही. -सिध्देश्वर काकडे




जालना: जालना तालुक्यातील सेवली येथे शिवभक्तांनी १९ फेब्रुवारी शिव जयंतीच्या पाश्र्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. यातुनच सेवली मध्ये तणावपुर्वक परीस्थिती निर्माण झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला जाऊ नये. आसी मागणी भाजपा युवा मोर्चा महामंत्री राहुल लोणीकर यांनी केली आसता जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दुर्लक्ष करत काल रात्री दिनांक १५ फेब्रुवारी रोजी पुतळा हटवला आहे. यावर शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी पहिली प्रतीक्रिया व्यक्त करत जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्यावर जहरी टीका केली आहे. जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणजे पाकिस्तान्याची औलाद आहे. हे हिंदवी स्वराज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला सरकारच्या परवानगीची गरज नाही. प्रशासनाचं डोकं ठिकाणावर नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे गोर गरीब कष्टकरी शेतकरी जणतेचे राजे होते. पण काय करणार पाकिस्तानी औलादिंना शिवरायांचा पुतळा सहन होणार नाही. आता आम्ही जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची खुर्ची हटवल्या शिवाय रहाणार नाही. आसा खणखणीत इशारा शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात