सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

हे हिंदवी स्वराज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला सरकारच्या परवानगीची गरज नाही. -सिध्देश्वर काकडे




जालना: जालना तालुक्यातील सेवली येथे शिवभक्तांनी १९ फेब्रुवारी शिव जयंतीच्या पाश्र्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. यातुनच सेवली मध्ये तणावपुर्वक परीस्थिती निर्माण झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला जाऊ नये. आसी मागणी भाजपा युवा मोर्चा महामंत्री राहुल लोणीकर यांनी केली आसता जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दुर्लक्ष करत काल रात्री दिनांक १५ फेब्रुवारी रोजी पुतळा हटवला आहे. यावर शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी पहिली प्रतीक्रिया व्यक्त करत जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्यावर जहरी टीका केली आहे. जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणजे पाकिस्तान्याची औलाद आहे. हे हिंदवी स्वराज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला सरकारच्या परवानगीची गरज नाही. प्रशासनाचं डोकं ठिकाणावर नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे गोर गरीब कष्टकरी शेतकरी जणतेचे राजे होते. पण काय करणार पाकिस्तानी औलादिंना शिवरायांचा पुतळा सहन होणार नाही. आता आम्ही जालना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांची खुर्ची हटवल्या शिवाय रहाणार नाही. आसा खणखणीत इशारा शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत