सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

डाँ .गोपाल तुपकर यांना सावित्रीबाई फुले भूषण पुरस्कार जाहीर


 मंठा-प्रतिनिधी /सुभाष वायाळ
      दि.22 मराठी साहित्य मंडळ तर्फे साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्याला दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले भूषण पुरस्कार यावर्षी मंठा येथील डॉ.गोपाळ विठोबा तुपकर यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. डॉ.गोपाल तुपकर यांचे अंतरीचे शब्दफुले हा काव्यसंग्रह व इतर अनेक काव्य व लेख प्रसिद्ध झालेले आहेत.साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार त्यांना वितरण केला जाणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर राष्ट्रीय अध्यक्ष मराठी साहित्य मंडळाचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवड झाल्याचे कळवले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे प्रा.सतीश वैद्य, संजय भवर, मुरलीधर बोराडे, सुभाष वायाळ, भीमाशंकर तुपकर, व शैक्षणिक क्षेत्रातील आणि साहित्य क्षेत्रातील सर्वाकडून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत