सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मंठा येथे छत्रपती खा.संभाजी राजे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न



 मंठा(सुभाष वायळ )दि.06 मंठा येथे छत्रपती खा.संभाजी राजे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून सामाजिक उपक्रम व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री.स्वामी समर्थ ब्लड सेंटर जालना व आयोजक सामाजिक कार्यकर्ते  कुलदीप बोराडे मित्र मंडळ यांच्या तर्फे करण्यात आले होते. मानवी रक्त कारखान्यात किंवा प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. मानवी रक्तास अजून पर्यंत पृथ्वीतलावर काही पर्याय नाही. रक्त तयार होते फक्त निरोगी मानवी शरीरात आपल्या संस्कृतीमध्ये दानास खूप महत्त्व आहे. गोदान, अन्नदान,भूदान या दानामुळे जीव जगू शकतो. परंतु रक्तदानामुळे जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्‍तीने रक्तदान करावे. अपघाताने धोक्यात सापडता प्राण, रक्त मिळताच मिळे जीवदान,ठेवूनिया सामाजिक जाण, पुण्यकर्म करावे करुनी रक्तदान या उक्तीप्रमाणे  रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या सामाजिक जाणिवेतून मंठा परिसरातील नागरिकांनी रक्तदानास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरामध्ये एकूण 30 नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कुलदीप बोराडे, मित्र मंडळ, श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर चे कर्मचारी अधिकारी यांनी श्रम घेतले.यावेळी आयोजक सामाजिक कार्यकर्ते कुलदीप बोराडे व श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटरचे अधिकारी यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत