सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतुरात 1990 च्या वर्ग मित्रांच्या गुणवंत मुलांचा सत्कार संपन्न प्रत्यक्ष व झूम मिटिंग द्वारे मित्रांनी केले पाल्यांचे कौतुक

परतूर: प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 जि. प.प्रशाला शाळेच्या सन 1990 च्या वर्गमित्रांचे स्नेहमिलन कार्यक्रम 25 डिसेंबर 2019 ला संपन्न झाला होता. या सर्व मित्रांचा व्हाट्सअप्प च्या माध्यमातून संपर्क कायम राहिला. या मित्रांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ हॉटेल आस्वाद येथे पार पडला.
परतूर येथील मित्र प्रत्यक्षपणे तर बाहेरगावातील मित्र झूम ऍप प्रणाली द्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील व्यावसायिक राहुल कुंपावत होते. या प्रसंगी सार्थक काशीनाथ देशमुख याचा कॉम्प्युटर सायन्स ला आणि सुशांत संदीप बाहेकर व नरेंद्र प्रशांत अंभुरे याचा MBBS ला प्रवेश झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जीवनातील सुख ,आनंद वाढविण्यासाठी व दुःख कमी करण्यासाठी मित्रासारखे नाते नाही. त्यामुळे सदरील नात्याला बळकटी देण्यासाठी मित्रांच्या गुणवंत मुलांचे कौतुक केलेच पाहीजे. याप्रसंगी नगरसेवक संदीप बाहेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत अंभुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे समारोप राहुल कुंपावत यांनी केला. याप्रसंगी संतोष चव्हाण, केदार शर्मा, सुनील मोर, परवेझ देशमुख, पुरुषोत्तम राठी,अनिल कुलकर्णी, प्रकाश खालापूरे,रमेश ठोंबरे, शामसुंदर चित्तोडा, राम देशपांडे, काशिनाथ देशमुख, उपस्थित होते तर डॉ.सतीश मुंदडा, राहुल कुलकर्णी, आनंद आसोलकर व इतर झूम प्रणाली द्वारे सहभागी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामा माने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत