सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मनसे विद्यार्थी सेनेकडुन' भोंग्याच्या आवाजावर हनुमान चालीसा


मंठा प्रतिनीधी सुभाष वायळ
 तालुक्यातील मौजे जयपुर काकडे येथे मनसे संस्थापक अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतीसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे सिध्देश्वर काकडे यांनी जयपुर काकडे येथील हनुमान मंदिर व श्री.राम मंदिर परिसरात भोंगे लाऊन हनुमान चालीसा पठण केली व दररोज सायंकाळी व सकाळी हनुमान चालीसा भोंग्याच्या आवाजावर वाजवत राहिल आसी माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी दिली आहे. 
        महाराष्ट्र राज्यासह देशभरातील हिंदु बांधवांकडुन राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतीसाद मिळत आसल्याने हि आनंदाची बाब आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. हनुमान चालीसामुळे हिंदु धर्मीय सामाजिक कार्यात एकवटतो व तसेच यामुळे हिंदु धर्माच्या नियमांचं पालन देखील होत आहे. व समाजात भक्तीभावाचं वातावरण निर्माण होत आसल्याने जालना जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक गावा गावात हनुमान चालीसा दररोज पठण करायला हवी आहे. आसे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. (फोटो सह बातमी)

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत