सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मनसे विद्यार्थी सेनेकडुन' भोंग्याच्या आवाजावर हनुमान चालीसा


मंठा प्रतिनीधी सुभाष वायळ
 तालुक्यातील मौजे जयपुर काकडे येथे मनसे संस्थापक अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतीसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे सिध्देश्वर काकडे यांनी जयपुर काकडे येथील हनुमान मंदिर व श्री.राम मंदिर परिसरात भोंगे लाऊन हनुमान चालीसा पठण केली व दररोज सायंकाळी व सकाळी हनुमान चालीसा भोंग्याच्या आवाजावर वाजवत राहिल आसी माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी दिली आहे. 
        महाराष्ट्र राज्यासह देशभरातील हिंदु बांधवांकडुन राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतीसाद मिळत आसल्याने हि आनंदाची बाब आसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. हनुमान चालीसामुळे हिंदु धर्मीय सामाजिक कार्यात एकवटतो व तसेच यामुळे हिंदु धर्माच्या नियमांचं पालन देखील होत आहे. व समाजात भक्तीभावाचं वातावरण निर्माण होत आसल्याने जालना जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक गावा गावात हनुमान चालीसा दररोज पठण करायला हवी आहे. आसे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. (फोटो सह बातमी)

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत