सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

इमर्जन्सी लोडशेडिंग च्या नावाखाली जनतेचा छळ वीजवितरणने थांबवावा-संपत टकले,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण ला भाजपाचे निवेदन

प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली वीज वितरण कंपनीने जनतेचा छळ चालवला असून रात्री-बेरात्री केव्हाही लाईट घालवण्याचे पाप वीज वितरण करीत असून श्रीष्टी सर्कल मध्ये एक दिवस आड विद्युत पुरवठा केला जात असल्याने नागरिकांसह शेतकरी हवालदिल झाला असून बागायती क्षेत्राला या वीज वितरण च्या गलथान कारभाराचा फटका बसत असल्याचे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले संपत टकले यांनी म्हटले आहे
आज भाजपा च्या वतीने इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावाखाली चालवलेला सावळागोंधळ थांबवावा यासाठी उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले यावेळी ते बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की वीज वितरण कंपनीने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा छळ न थांबवल्यास आमचे सर्वोच्च नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संपत टकले यांनी यावेळी वीज वितरण ला दिला
पुढे बोलताना संपत टकले म्हणाले की राज्यातील आघाडी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचे पाप करू नये उन्हाळ्याच्या दिवसात इमर्जन्सी च्या नावाखाली दोन दोन दिवस वीज गायब असते अशा परिस्थितीमध्ये जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसून अनेकांना आपल्या पिकांना पाणी देता येत नाही आबालवृद्ध यांना रात्रीच्या गर्मीचा त्रास सहन होत नाही अशा परिस्थितीत वीज वितरण तुघलकी भूमिका घेत असून यामुळे सर्वसामान्य जनता छळली जात असल्याचा आरोप या वेळी टकले यांनी केला
या वेळी यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भगवानराव मोरे दया काटे ओमप्रकाश मोर श्रीरंगराव जईद दिनेश शेठ होलानी नगरसेवक संदीप बाहेकर नगरसेवक प्रकाश चव्हाण नगरसेवक कृष्णा आरगडे राजेंद्र मुंदडा जगन्नाथ सोनखेडकर, शिवाजी बल्लमखाणे बळीराम हिवाळे प्रमोद राठोड मुज्जू कायमखानी मलिक कुरेशी नंदकिशोर मुंदडा आनंद कोटेचा जगदीश झंवर ओमप्रकाश राठी श्यामसुंदर चितोडा नरेश कांबळे राजेश म्हस्के अमर बगडीया संतोष काळे अमोल हरजुळे, भास्कर काळे दीपक कुरे विष्णू मचाले लालचंद मालपाणी सौरभ बागडीया यांच्यासह शेकडो कार्यकर्यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत